गुरुवार, ९ मे, २०१९

जनमत-२०१९ भाग ३

|| श्री ||




मीन संक्रमणातील पहिले चरण हे सत्ताधारी गटाला काहीसे झुकते माप देईल हे आपण पहिल्या भागात पाहिले. तर दुसऱ्या भागात मेष संक्रमणात मतदानाचे पाच चरण येतात व यात जरी विरोधी गट प्रबळ होत जातांना दिसत असला तरी सत्ताधारी गटाला यात घवघवीत, दैदिप्यमान यशाची संभावना जास्त आहे हे आपले अनुमान निघते. आता शेवटचे मतदान चरण जे वृषभ संक्रमणात येते ते जनमताचा कौल काय दाखवतो चला तर ते बघू.
३) वृषभ संक्रांत :- १५/५/२०१९, सका.११:००

   कर्क लग्न १५ अंश ५१ कलांवर वृषभ संक्रांत होते आहे. या संक्रमणात मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडून मतमोजणी होऊन सरकार स्थापन होणार आहे. तसे बघितले तर मेष संक्रमण जास्त महत्वाचे आहे. या कुंडलीत शुक्र दशमात आल्याने या चरणात विरोधी गट सरसी मारेल असे प्रथम दर्शनी वाटत असले तरी शुक्र चंद्र षडाष्टक योग तर चंद्र मंगळ केंद्र योग असल्याने दोघांनाही प्रतिकूल आहे. त्यामुळे असे वाटते कि एकतर मतदानाची टक्केवारी घटेल किंवा नोटा चा वापर जास्त होईल. पण फायदा मात्र विरोधी गटाला होईल. कारण १९ मे ला सातव्या चरणातील मतदानाच्या दिवशी तर चंद्र शुक्र व मंगळ दोघांशीही षडाष्टक योग करतो आहे, पण शुक्र दशमात हर्षलशी युती करता आहे. शुक्र दशमात असल्याने या चरणातील कला, मनोरंजन, क्रीडा क्षेत्राशी संबंधित तसेच स्त्री उमेदवार यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.

अनुमान :- मीन,मेष,वृषभ या तीन संक्रमणाचा विचार करता सत्ताधारी गटाला बहुमत मिळेल.
मतमोजणी साठी कुंडली पहायची गरज नाही. कारण झालेले मतदानच  मोजले जाणार आहे. सरकार स्थापणे साठी फारतर आपण विचार करू शकतो म्हणजे पंतप्रधानपद परत श्री.मोदींना मिळेल का ? कारण मुळात हि निवडणूक सत्ताधारी व विरोधी गटाने श्री.मोदीं भोवती केंद्रित केली आहे हे आपण पहात आहोच. विरोधी गट सत्ताधारी गटाला हरवण्यासाठी नव्हे तर केवळ श्री.मोदींना पायउतार करण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मी जो प्रयोग करतो आहे त्या नुसार वृषभ संक्रमणाची कुंडली श्री.मोदींच्या चहात्यांना धक्का देवू शकते. मी हे अगोदरच स्पष्ट केले आहे कि मेदनियेत सामान्यता जसा विचार केला जातो त्यात मला सुचलेला किंचित बदल करून विश्लेषण करत आहे. मलाही हे विचित्र वाटतेय पण या कल्पने नुसार जे आकलन होतेय ते मांडले पाहिजे.
तर मित्रांनो भावनेला मुरड घालून प्रायोगिक अनुमाना कडे येतो. या संक्रांत कुंडली नुसार (जर या संक्रमणात पंतप्रधान पदाचा निर्णय झाला तर) पंतप्रधानपदी अन्य कुणाची निवड होऊ शकते. भारताच्या पंतप्रधानपदी परत महिला विराजमान होण्याचे संकेत हि कुंडली देते आहे. नाही नाही विरोधी गटातील चेहऱ्यांकडे पाहू नका, तर सत्ताधारी गटातूनच हे होईल. असे झाले तर विरोधी गटाला नीती आणि नैतिक विजय झाला असे म्हणता येईल, नाही तरी ते NDA नाही तर श्री.मोदींना हरवण्यासाठीच लढतायेत. पण पण जर हा पंतप्रधान पदाचा निर्णय मिथुन संक्रमणा पर्यंत पुढे गेला तर मात्र चित्र वेगळे असेल.
छे, कशाला हे करत बसलो असे वाटू लागलाय. त्या पेक्षा “.....शेवटी येणार तर मोदीच” हे सुखद वाटत.

३ टिप्पण्या: