||श्री||
रविवार, १७ सप्टेंबर, २०२३
शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३
अष्टोत्तरी दशा
||श्री||
अष्टोत्तरी दशा
काल एका ज्योतिष शिक्षक मित्राचा फोन आला होता.
अष्टोत्तरी दशांचे सुत्रां विषयी विचारणा केली. आता विंशोत्तरी महादशाच वापरत
असल्याने व मी ही कधी या अष्टोत्तरी दशा वापरल्याचे स्मरत नाही. त्यामुळे चटकन असे
सूत्र कसे सांगू शकणार. दुपारी ४ ला चर्चा करू असे ठरले. पण ते विसरले. रात्री मला
आठवण झाली. कुंडलीची भाषा ग्रंथात अष्टोत्तरी दशा विषयी काही नाही. ज्योतिष सोबती
मध्ये सूत्र नाहीत, त्यात तक्ते दिलेत. तेही अंतर्दशा पर्यंतच. त्यांना विदशा पर्यंत
हवे होते. या वर्षी ज्योतिष शास्त्री परिक्षेत निबंधा मध्ये या विषयी काही प्रश्न
आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सूत्र वापरून शिकवायला हवे. म्हणून आधी त्रैराशीक पद्धतीने
सूत्रे तयार केली. सर्वांच्या माहिती साठी ती सूत्रे उदाहरणा सहित येथे ब्लॉग वर
देत आहे.
अष्टोत्तरी दशा सूत्र.
१) अंतर्दशा महिन्यात = मxअ/९
२) विदशा दिवसात = (म x अ x वि x ३०) /९७२
२५/०८/२०२३ सका. ११:५४ चंद्र – ७/१८°/१०’/४६” जन्मत: भुक्त भोग्य अष्टोत्तरी महादशा काढून
गुरु महादशेत शुक्र अंतर्दशेत चंद्र विदशा काढा?
è चंद्र जेष्ठा नक्षत्रात पहिल्या चरणात आहे.
चंद्र अनुराधा, ज्येष्ठा, मूळ नक्षत्रात असता बुध अष्टोत्तरी महादशा असते. बुध
महादशा १७ वर्षे आहे. एका नक्षत्रात ५ वर्षे ८ महिने. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात
असल्याने अनुराधा नक्षत्राची ५ वर्षे ८ महिने भुक्त झाली. ज्येष्ठा नक्षत्राची
व्याप्ती वृश्चिकेत १६/४० ते ३०/०० आहे.
चंद्र भुक्त अंशादी = चंद्र अंश, कला – ज्येष्ठा
आरंभ
= १८/१०/४६ – १६/४०/०० = ०१/३०/४६ = १.५१७८ अंश
ज्येष्ठा भुक्त अष्टोत्तरी बुध महादशा = १३.३३३३
अंश ला ---- ५.६६६७ वर्षे
तर १.५१७८ अंशा ला ---- ?
= १.५१७८ x ५.६६६७ / १३.३३३३ = ०.६४५१ वर्ष = ७
मास २२ दिवस
अष्टोत्तरी बुध महादशा भुक्त = भुक्त अनुराधा +
भुक्त जेष्ठा
= ५ वर्षे ८ मास ०० दिवस + ० वर्ष ७ मास २२ दिवस
= ६ वर्षे ३ मास २२ दिवस
ज्येष्ठा अष्टोत्तरी बुध महादशा भोग्य = ५ वर्षे ८ मास ०० दिवस – ० वर्ष ७ मास २२ दिवस
= ५
वर्षे ० मास ०८ दिवस
अष्टोत्तरी बुध महादशा भोग्य = ज्येष्ठा भोग्य +
मूळ भोग्य
= ५ वर्षे ० मास ०८ दिवस + ५ वर्षे ८ मास ०० दिवस
= १० वर्ष ०८ मास ०८ दिवस
अष्टोत्तरी बुध महादशा समाप्ती = जन्म तारीख +
भोग्य महादशा
= २५/०८/२०२३ + ०८/०८/००१० = ०३/०५/२०३४
अष्टोत्तरी बुध महादशा समाप्ती = ०३/०५/२०३४
अष्टोत्तरीत बुधा नंतर शनि व मग गुरु महादशा
येते. शनि महादशा १० वर्षे आहे व गुरु महादशा १९ वर्षे
अष्टोत्तरी शनि महादशा समाप्ती = ०३/०५/२०४४
अष्टोत्तरी गुरु महादशा समाप्ती = ०३/०५/२०६३
प्रथम गुरु महादशेत शुक्र अंतर्दशा काढू. त्या
साठी गुरु महादशेत गुरु व राहू भुक्ती एकत्रित काढून घेवू, जो शुक्र अंतर्दशा आरंभ
असेल.
= गुरु
म.द. x (गुरु भुक्ती + राहू भुक्ती) / ९
= १९ x (१९+१२) / ९ = १९ x ३१ / ९ = ५८९ / ९ = ६५.४४
महिने
= ५ वर्षे ०५ मास १३ दिवस
शुक्र अंतर्दशा आरंभ = शनि म.द. समाप्ती + राहू
अंतर्दशा समाप्ती
= ०३/०५/२०४४ + १३/०५/०००५ = १६/१०/२०४९
शुक्र अंतर्दशा आरंभ = १६/१०/२०४९
शुक्र अंतर्दशा = गुरु म.द x शुक्र अ.द. / ९ = १९
x २१ / ९ = ३९९/९
= ४४.३३ महिने = ३ वर्षे ८ मास १० दिवस
शुक्र अंतर्दशा समाप्ती = शुक्र अंतर्दशा आरंभ +
शुक्र अंतर्दशा
= १६/१०/२०४९ + १०/०८/०००३ = २६/०६/२०५३
शुक्र अंतर्दशा समाप्ती = २६/०६/२०५३.
गुरु महादशेत शुक्र अंतर्दशेत चंद्र विदशा
काढायची आहे. त्या करता प्रथम शुक्र व रवि विदशा एकत्रित काढू.
विदशा (दिवसात) = (म x अ x वि
x ३०) /९७२
चंद्र विदशा आरंभ = गुरु म.द. x शुक्र अ.द. x (शुक्र वि.द. + रवि
वि.द.) x ३० / ९७२ = १९ x २१ x (२१+६) x ३० / ९७२
= १९ x २१ x २७ x ३० / ९७२ = ३२३१९० / ९७२ = ३३३ दिवस = ११ मास ०३
दिवस
चंद्र विदशा आरंभ = शुक्र अंतर्दशा आरंभ + रवि विदशा समाप्ती.
= १६/१०/२०४९ + ०३/११/०००० = १९/०९/२०५०
चंद्र विदशा आरंभ = १९/०९/२०५०.
चंद्र विदशा = गुरु म.द. x शुक्र अ.द. x चंद्र वि.द. x ३ / ९७२
= १९ x २१ x १५ x ३० / ९७२ = १७९५५० / ९७२ = १८५ दिवस
= ६ मास ५ दिवस
चंद्र विदशा समाप्ती = चंद्र विदशा आरंभ + चंद्र विदशा = १९/०९/२०५० +
०५/०६/०००० = २४/०३/२०५१.
चंद्र विदशा समाप्ती = २४/०३/२०५१.
पुढील लेख:- बघ माझी आठवण येते का? भाग-१.
शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३
पूर्व संचित - १
||श्री||
मागील लेख :- जन्मवेळ निश्चिती – २
पूर्व संचित – १
बहिणीने २ वर्षा पुर्वी नवीन घर घेतले. तिथे आल्या पासून
तिच्या मुलांना काहीना काही समस्या आहेत.
मुलगा - १९/११/२०१४, ९:००, जगतपूर, राणीगंज, प्रतापगड, उ.प्र. 25°44'46.6"N
82°11'14.7"E
नोव्हें./डिसे. २०२२ मध्ये ब्लड कॅन्सरचे निदान झाले.
१०/०८/२०२३, १३:१२ è प्रश्न कुंडली वरून लगेचच त्यांना
उत्तर दिले होते. आज अभ्यासाठी या मुलाची कुंडली घेतली आहे. आताचे शासक ग्रह आहेत L – मं(रा), S – चं, R – शु(के), D – गु.
षष्ठाचा सब राहू मंगळाचा प्रतिनिधी म्हणून शासक ग्रहात आहे तर खरा त्यामुळे सब राहू बरोबर आहे. पण जन्मस्थान उत्तरप्रदेशातील दूर खेडयात असून तिथे आजही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शंका होती. तसेही मागचा मंगळ व पुढचा गुरु हे वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहेत. षष्ठ भाव वृषभेत १३/१८/४४ वर चंद्राच्या नक्षत्रात व राहुच्या सब मध्ये आहे. शासक ग्रहात चंद्र असल्याने अगोदरचा ग्रह सब घेण्याचा संकेत आहे. मंगळ तर वक्रीग्रहाच्या नक्षत्री आहे, त्या अगोदरचा चंद्र पण तो शासकग्रहात दोनदा नसल्याने त्याचा विचार करता येणार नाही. त्या अगोदर मग रविच्या नक्षत्रात बघावे लागेल, पण रवि शासकग्रहात नाही. त्यामुळे षष्ठाचा सब राहू बरोबर आहे हे मान्य करूया.
लग्नेश गुरु अष्टमात मारकेश,
बाधकेश, परमशत्रू बुधाच्या नक्षत्री. राशीस्वामी कन्येचा चंद्र दशमात स्वनक्षत्री
असला तरी राहू युतीत. कृष्ण दशमी ते शुद्ध पंचमीचा चंद्र बलहीन असतो येथे चंद्र
कृष्ण व्दादशीचा आहे. त्यामुळे लग्नेश उच्चीचा असला तरी फारसा बलवान नाही. बालारिष्ट
योगाला पूरक योग आहे हा. सर्वसाधारनपणे लग्नेश अष्टमात असता दीर्घायू योग मानला
जातो पण तेथे तो कोणत्या परिस्थितीत आहे ते पहावे लागते. सहा ग्रह नवम ते व्दादश
भावत आहेत हा अल्पायु योग ( ८ ते ३२ वर्षे) झाला. लग्नेशा पेक्षा अष्टमेश बलवान हा
अल्पायुला पूरक योग झाला. जातकाचे वय ८ वर्षे ८ मास आहे. म्हणजे नेमके जातकाने
बालारीष्ट ची मर्यादा ओलांडून अल्पायु कक्षेत नुकताच प्रवेश केला आहे. अल्पायु
योगात घातक ठरणारी विपत दशा (येथे राहू दशा) जातकाला वयाच्या ७ वर्षे ८ मासा नंतर
म्हणजे ०७/०८/२०२२ ला चालू झाली व जातकाला त्या नंतर ३/४ महिन्यातच रक्ताच्या
कर्करोगाचे निदान झाले. राहू महादशेत राहू अंतर्दशा १९/०४/२०२५ पर्यंत आहे. तर
राहू विदशा ०२/०१/२०२३ पर्यंत होती ज्यात जातकाला कर्करोगाचे निदान झाले. राहू, शनि, केतू च्या दशा जातकाला घातक आहेत. राहू म.द. शनि अ.द. केतू विदशा जी २१/०७ ते
२०/९/२०२८ दरम्यान असणार आहे तो काळ घातक ठरू शकतो.
लग्नेश त्रिकस्थानात निर्बली असता काही तारक योग आहेत. त्यापैकी एक म्हणजे धनु लग्नाला कर्केचा गुरु हा उच्च असल्याने तारक योग पण या बाबतीत आपण वरती पाहिले आहे. दुसरे म्हणजे लग्नेश त्रिकस्थानात त्रिकस्थानेशाने दृष्ट अथवा त्रिकस्थानात त्रिकस्थानेशाने युक्त असता तारक योग होतो. पण येथे हाच योग रक्ताच्या कर्करोगाला कारक ठरला आहे, कसे ते पाहू. लग्नेश गुरु अष्टमात कर्केचा आहे, बरोबर. गुरु कर्करोगाचा एक कारक आहे व कर्करोगाची कारक मानल्या गेलेली रास कर्केत आहे. हा योग अष्टमात आल्याने कर्करोगाने मृत्यू संभवतो. मंगळ हा रक्ताचा कारक ग्रह त्याची अष्टम घातक दृष्टी गुरुवर. मंगळ व्ययत्रिकस्थानेश आहे. म्हणजे लग्नेश गुरु अष्टमात व्ययेश मंगळाने दृष्ट हा तारक योग होऊनही कारकत्वाने रक्ताचा कर्करोग झाला. वास्तविक कुंडलीत तारक योग आहेत पण कारकत्वाची फले मिळाली, का? योगा मुळेचे. एका योगा पेक्षा दुसरा योग बलवान ठरला, कोणता ? अभागी योग.
भाग्येश ६/८/१२ स्थानी असता अभागी योग होतो. जो या कुंडलीत झाला आहे, भाग्येश रवी व्ययात. त्यात हा रवी व्ययात अष्टमातील गुरुच्या नक्षत्री आहे.
म्हणजे गुंफण बघा कशी झाली आहे. एकतर लग्नेश अष्टमात फक्त दिसायलाच बलवान. या बाबत
वरती लिहिले आहेच. त्यात अभागी योग. रवी हा आरोग्य कारक, आत्मतेज कारक ग्रह तोच अभागी ठरला. शिवाय रवि त्याच्या मृत्यूस्थानी आहे. चर
आत्माकारक गुरु आहे. नै.आत्माकारक हा चर आत्माकारकाच्या नक्षत्री व दोघेही त्रिक
स्थानी. दशमेश बुध लाभात मित्र राशीत आहे
हा चांगला योग आहे पण बुधाचा राशीस्वामी शुक्र व्ययात अस्तंगत तर त्याचा
नक्षत्रस्वामी गुरु अष्टमात. म्हणजे १,९,१० चे स्वामी त्रिकस्थानाशी संबंधित
झाले तर दुसरी कडे त्रिकस्थानेशा पैकी व्ययेश मंगळ मित्र राशीत षष्ठेश शुक्राच्या
नक्षत्री, अष्टमेश चंद्र मित्र राशीत स्वनक्षत्री. १,९,१० व ६,८,१२ पैकी कोण बलवान हे ठरवणे जरा क्लिष्ट होतेय पण त्रिकस्थानांशी संबंधित होत
असल्याने दु:खे, त्रास, अडचणी भोगाव्या लागतात. हे एवढ्यावरच संपत नाही तर सर्व सुखाचे आगर
चतुर्थस्थान हि दुषित. येथे केतू बाधकेश बुधाच्या नक्षत्री. चतुर्थेश गुरूच आहे
त्यामुळे भाव व भावेश दोन्ही बिघडले आहेत. वैराग्य, मोक्षकारक केतू इथे काय सुख देणार? देणार ना सुख, पण त्या सुखाच्या दाना साठी झोळी वेगळी लागते.
सुख स्थान हे मोक्षस्थानही आहे त्यामुळे वर चर्चेलेली ग्रह स्थिती
बालारीष्ट/अल्पायु योगाला बळकट करते आहे. मोक्ष त्रिकोणाचे स्वामी मोक्षत्रिकोणाशी
संबंधित आहेत. चतुर्थेश अष्टमात,
व्ययेशाची चतुर्थावर व अष्टमावर दृष्टी. अष्टमेशाची चतुर्थावर दृष्टी.
चतुर्थेशाची चतुर्थावर, व्ययावर दृष्टी. या पैकी चंद्र, मंगळाची दिप्तांश दृष्टी चतुर्थावर
आहे. येनकेन प्रकारे ४,८,१२ चा ४ शी संबंध केंद्रित झाला आहे. हा योग अध्यात्म सुख, मोक्ष ला चांगला आहे असे म्हणू शकतो. एखादाच नचिकेता, एखादेच आद्य शंकराचार्य युगा युगात होतात आणि आता सन्यासाश्रमही तसा राहिला
नाही म्हणा. भाबडेपणाने असे वाटते कि या मुलाला सन्यासधर्माची दिक्षा दिली, एखाद्या योग्य गुरुच्या पायावर घातले तर अष्टमातील गुरु दिर्घायुष्य देईल. हे
सांगावे तरी कसे म्हणा. आणि आता उशीर झाला आहे. आईचा मोहबंध सुटेल? मातेचा कारक चंद्र हा राहू युतीत आहे व त्याची चतुर्थावर दृष्टी आहे.
अध्यात्मात प्रगती होईल? फक्त पंचमेश लग्नी या योगावर? कारक व नवमेश रवि बलहीन, गुरु अष्टमात, शनि व्ययात आहे पण अस्तंगत,
कसे जमनार? पंचमेश व्ययेश मंगळाची कंटकस्थ केतूवर अंशात्मक दृष्टी, निवृत्तीपर त्रिकोणातील उच्च गुरूची केतूवर दिप्तांश दृष्टी निवृत्तीयोगास
पुष्टी देतो आहे. अष्टमेश चंद्राची केतूवर अंशात्मक दृष्टी. चतुर्थस्थ केतू
मोक्षकारक असतो त्यात इथे अष्टम,
व्ययाचा संबंध. पूर्वजन्माचे तीव्र देहक्लेश लवकारात लवकर भोगून इहलोक
सोडायचे पूर्वसाकृत घेवूनच जातक आल्याचे हि कुंडली दर्शवित आहे. लग्नेश, रवि, चंद्र तिन्ही केंद्र दुषित आहेत. पौगांडावस्थेत ज्यांच्यात थिऑसॉफिकल
सोसायटीने प्रगत आध्यात्मिक शक्ति पाहिली होती ते जे.कृष्णमूर्ती म्हणतात
“लेडबिटरला (विख्यात गूढवादी व थिऑसॉफिकल सोसायटीचे नेते) लागलेला त्यांचा (कृष्णमूर्तींचा)
शोध हि त्यांच्या आयुष्यातील क्रांतिकारक घटना होती; अन्यथा लवकरच त्यांचा मृत्यू ओढावला असता.” पुढे दीर्घायुष्य प्राप्त करत वयाच्या
९१ व्या वर्षी त्यांनी देह ठेवला.
असो, या मुलाची रोगाशी झुंझ यशस्वी होवो, सर्वांच्या प्रयत्नाला व
प्रार्थनेला यश येवून मुलाला निरोगी दीर्घायुष्य लाभो या शुभचिंतनासह हा लेख इथे
संपवतो. धन्यवाद.
बुधवार, १२ जुलै, २०२३
जन्मवेळ निश्चिती -२ #Rectification of Birth
||श्री||
जन्मवेळ निश्चिती -२ #Rectification of Birth
जातक:-
पुरुष, १८/०७/१९७५, दिल्ली गेट, अहमदनगर. 19°05'50.7"N 74°43'54.0"E (19.097417, 74.731656) जन्मवेळ
माहित नाही. होरारी नं. – ०९/०७/२०२३, १८:४८ – ४७
१९:१९:१४è
जातकाने या अगोदर दोन वेळा जन्मवेळ संशोधन केले आहे पण जातकाचे समाधान झाले नाही.
त्यामुळे परत एकदा त्यांनी जन्मवेळ संशोधन करण्याचा निर्णय घेतला. जातकाचे आई वडील
दोघेही हयात नाही. लहानपणी बनवलेली कुंडली काही कारणाने हरवलेली आहे आणि जातकाला
जन्मतारीख व ठिकाण फक्त माहित आहे जन्मवेळ नाही. काही नातेवाईक १८ तारखेला रात्री
जन्म झाला असे सांगतात तर काही सकाळी. या कालावधीत किमान ६ कुंडल्या तरी बनू
शकतील. अगोदरच्या ज्योतिर्विदांनी केलेले जन्मवेळ संशोधन चुकीचे केले असे मी मुळीच
म्हणणार नाही कारण अंदाजे काळ हा बराच मोठा आहे. बाकी काही माहिती घेण्या अगोदर मी
होरारी नंबर वापरून संशोधन करायचे ठरवले नंतर काही घटना ताडून पाहता येतील.
L – बु, S – श, R – गु, D – र. शनि स्वता
वक्री आहे पण मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात आहे. प्रथम हे निश्चित करावे लागेल कि
जन्म सायंकाळी, रात्री कि सकाळी. शासक ग्रहात चंद्राचा दुरान्वयेही संबंध येत
नाही. जरी तो शासक ग्रहात असता तरी वगळावा लागला असता कारण तो वक्री शनि च्या
नक्षत्रात आहे. त्यामुळे रात्री जन्म नाही हे निश्चित झाले.
रवि शासक ग्रहात असल्याने दिवसा जन्म आहे असा निष्कर्ष लगेच काढू नका कारण जातकाने
तसे तर सायंकाळ पासून चा कालावधी सांगितला आहे. दिवसाचा जन्म नाही हे मी केवळ
जातकाच्या सांगण्यावर म्हणत नाही तर शासक ग्रहात शनि असून तो संधी प्रकाश काल दर्शवितो.
तसे तर ग्रहशिलात संध्याकाळी राहू कालबळी तर केतू प्रात:काली कालबली असतो असे
सांगितले गेले आहे. याचा काही उपयोग करता येतो का पाहू. राहू शासक गुरु युक्त
असल्याने जन्म संध्याकाळी झाला असावा. आता होरारी कुंडलीत रवि लग्नी असल्याने आपण
असे म्हणू शकतो कि जन्म प्रात:काली झाला असावा आणि याला आधार देण्या साठी शासक
गुरुच्या सप्तमात केतू आहेच. बुध होरारी लग्नेश असल्याने जन्म बुधाच्या लग्नात
झाला असावा असा तर्क करता येईल. बघुया त्या वेळी त्या ठिकाणी बुधाचे लग्न कधी
होते. मिथुन लग्न पहाटे ३:४८ ते ६:०० व कन्या लग्न सका. १०:२२ ते १२:२८ दरम्यान
होते. सूर्योदय साधारण ६:०६ होता. त्यामुळे प्रथम मिथुन लग्नाचा विचार करू या. मिथुनेत
मंगळ, राहू, गुरूची नक्षत्रे आहेत. या पैकी फक्त गुरु शासकग्रहात आहे. गुरुचे
नक्षत्र पहाटे ५:१५:१६ ते ६:००:०८ दरम्यान होते. यात रविचा सब घेवू. रविचा सब पहाटे
५:५४:३९ ते ५:५७:३८ दरम्यान उदित होते.
घटना
तपासून पाहण्या अगोदर एका नियमाधारे वरील वेळ तपासून पाहू या. प्रश्न वेळेचे
चंद्राचे सहशासक हे जन्मवेळचे लग्नाचे सहशासक असतात व प्रश्नवेळचे लग्नाचे सहशासक हे
जन्मवेळच्या चंद्राचे सहशासक असतात. खूपच खात्रीशीर असा हा नियम आहे असे म्हणता
येणार नाही.
प्रश्न वेळचे चंद्र सहशासक – गुरु, शनि, गुरु. प्रश्न वेळचे लग्न सहशासक – बुध, मंगळ, चंद्र.
जन्म वेळचे लग्न सहशासक – बुध,
गुरु, रवि. जन्म वेळचे चंद्र सहशासक – शुक्र, गुरु, रवि.
हा
नियम तंतोतंत लागू करायचा म्हटले तर एकतर आपल्याला जन्मतारीख बदलावी लागेल किंवा
जन्मवेळ. कारण जन्म चंद्र व प्रश्न लग्न यांचे एकही सहशासक जुळत नाही. १९ जुलैला या
वेळी चंद्राचे सहशासक होते मंगळ, शनि, मंगळ. निदान मंगळ तरी जुळेल. दुसरी जन्मवेळ
चाचपडायाची म्हटले तर शनि विचारात घ्यावा लागेल. गुरूला प्राधान्य दिले तर धनुत
गुरु आणि शनिचे नक्षत्र नाही, मीनेचाच विचार करावा लागेल. मिनेतही गुरुच्या
नक्षत्रात शनिचा सब नाही, शनीच्या नक्षत्रात गुरुचा सब आहे. मीनेत शनिच्या
नक्षत्रात गुरुच्या सब मध्ये लग्नबिंदू रात्री ११:१४ ला उदित असेल. चंद्र या वेळी
वृश्चिकेत शनिच्या नक्षत्रात असल्याने ठीक आहे पण रात्रीचा जन्म शासकग्रहांनी आधीच
खारीज केलेला आहे. कुंभेत गुरुचे नक्षत्र व सब असला तरी कुंभ लग्न रात्री ८:५०
पासून आहे आणि मकर लग्न सायंकाळी ७:०० पासून असले तरी त्यात गुरुचे नक्षत्र नाही, शिवाय
प्रश्न वेळी शनि वक्री आहे. तंतोतंतचा आग्रह सोडून तारतम्याने घ्यायचे म्हटले तर
गुरुचे धनु लग्नातील रविचे नक्षत्र घेता येईल जे सायं. ०६:४७:०८ ते ०७:००:२५
दरम्यान उदित होते. असे केल्याने जन्मलग्न शासक गुरु, रवित येईल तर प्रश्न चंद्राचा
सहशासक गुरु जुळेल. तसेच शासक गुरु राहू युक्त असल्याने सायंकाळ हि सिद्ध होईल.
तसेच सूर्यास्त ७:०८ चा असल्याने त्याच्या थोड अगोदर जन्मवेळ येत असल्याने
शासकातील शनि, रवि हे हि सिद्ध होतील. या वेळी जन्म चंद्र वृश्चिकेत असल्याने तोही
प्रश्न लग्नाच्या सहशासकाशी संबंधित होईल. यात एक अडचण येते ती म्हणजे धनुत
उत्तराषाढात ना बुधाचा सब येत ना शनिचा. अश्या वेळी उदित ताऱ्याची मदत घेता येईल.
प्रश्नवेळी मंगळ उदिततारा आहे आणि मंगळचा सब धनुत उत्तराषाढात सायं ६:५४:१५ ते ६:५७:१९ दरम्यान उदित होते. तुम्हाला फारच
वाटत असेल कि शासक बुधावर अन्याय होतो आहे तर बुधाचा सब सब घेवूनच टाका. उगीच
माझ्या पोस्ट वर ट्रोलिंगचे मोर्चे काढत बसू नका बुधाला डावलले म्हणून. बुधाचा सब
सब ६:५५:४८ ते ६:५६:१३ दरम्यान उदित होता. जन्मवेळ यातील मध्य म्हणजे सायं. ६:५६ घेवूया. ठीक आहे ना? यात शासक ग्रहांना
प्रतीनिधीत्व मिळाले, सहशासकां मधले काही आले. राहू केतू पैकी एकाचा मान ठेवला. सगळे
खुश ना? या वेळी प्रश्न लग्नाचे दोन सहशासक मंगळ, बुध हे जन्मचंद्राचे सहशासक
होतात, त्यामुळे हि जन्मवेळ असावी याचा भरोसा जास्त वाटतो.
सायंकाळची
वेळ घेतल्याने त्या तिकडून होरारी लग्नात बसलेले शासक रवि महोदय मला म्हणतायेत “म्हणजे
आम्ही यडे का?” का गरिबाला छळताय अध्यक्षमहोदय. तस नाहीये ओ. अजून घटना तपासायच्या
आहेत, तेव्हा शिक्का मोर्तब होईल. आणि अध्यक्षमहोदय सकाळची वेळ घेतली तरी तुम्ही
क्षितिजावर आहात कुठे, उलट सायंकाळी तुम्ही क्षितिजावर आहात.
आता एखादी घटना ताडून पाहू. मी अजून जातकाशी या वर चर्चा केलेली नाही. आई वडील दोघेही हयात नसल्याचे जातक बोलून गेला आहे. त्यावर विचार करण्या पेक्षा मी जातकाचा विवाह केव्हा झालेला असू शकतो या वर १८/०७/१९७५, १८:५६ च्या कुंडली नुसार अंदाज बांधून मग जातकाशी चर्चा करायचे ठरवले. या कुंडली नुसार सप्तमाचा सब रवि २,७ चा बलवान कार्येश आहे तो विरोधी १,१२ चाही कार्येश आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येतील पण सब रवि विवाह देईल. रवि शनिच्या युतीत सप्तमात आहे. सप्तमावर शनिचा चांगला प्रभाव आहे, शनि सप्तमबिंदू अंशात्मक युती आहे. त्यामुळे विवाहाला उशीर झाला असणार हे नक्की. वयाच्या १५ ते ३२ पर्यंत बुध महादशा आहे. बुध ११ चा कार्येश आहे. ३० च्या आसपास विवाह संभव असल्याने गुरूची किंवा शनि अंतर्दशा विचाराधीन होती. गुरु ७ चा तर शनि २,७,११ चा कार्येश असल्याने शनि अंतर्दशा नक्की केली. शनि २,७,११ तिन्हीचा कार्येश असल्याने त्याचीच विदशा घेतली. ती २२ एप्रिल ते २५ सप्टेंबर २००४ दरम्यान होती. गोचरीचा जुजबी विचार करून मे/जून २००४ मध्ये विवाह झाला असावा असा अंदाज बांधला व जातकाला फोन केला. त्यांना सायंकाळी ६:५६ ची वेळ सांगितली व विवाहाचा अंदाज सांगितला. त्यांनी विवाह २९/०२/२००४ रोजी झाल्याचे सांगितले. त्या नंतर इतर काही बाबींचा पडताळा घेतला. ते सर्व काही इथे लिहित नाही. किती लिहिणार ना? सर्व काही अचूक जुळणार नाही हे त्यांना तसे आधी सांगितले होतेच. त्यांना एक आजार होऊन गेला तो मात्र नाही सांगता आला. जवळ पास ६० ते ७०% जुळले असे म्हणता येईल.
जन्मतारीख - १८/०७/१९७५, जन्मवेळ - सायं. ०६:५६, जन्मस्थान - अहमदनगर 19°05'50.7"N 74°43'54.0"E, अयनांश - के.पी. २३°/२५'/०८".
जन्मलग्न - धनु २८°/५३'/०८". जन्मचंद्र - वृश्चिक ०६°/३१'/२४".
या अगोदर जातकाने दोनदा जन्मवेळ संशोधन केले होते. मी जन्मवेळ संशोधन केल्यावर मागचे त्यांनी पाठवले ते १)सायं. ०७:४४:५६. २)सायं. ०४:५४.



