मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

श्री. एकनाथ शिंदे. जन्मवेळ संशोधन

 

||श्री||

मागील लेख:- काका पुतने लढत. 

श्री. एकनाथ शिंदे. जन्मवेळ संशोधन



महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात २०२४ ची विधानसभेची निवडणूक महायुतीने लढवली. महायुतीचा प्रचंड विजय झाला. पहिल्या पासूनच राजकीय विश्लेषक व बहुतांशी ज्योतिष वर्ग श्री.शिंदे हेच परत मुख्यमंत्री होतील असे सांगत होते. मी एका ज्योतिष अभ्यास समुहावर १५ आक्टोंबर २०२४ रोजी ज्यावेळी २० नोव्हेंबर हि   मतदानाची तारीख जाहीर झाली त्यावेळीच भाकीत केले होते की महायुती जिंकेल पण श्री.शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. ५ डिसेंबरला श्री.फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर काही जणांच्या पोष्ट वरून मला असे वाटू लागले कि बहुधा मी एकमेव असा होतो ज्याने श्री.शिंदे मुख्यमंत्री होऊ शकणार नाही असे भाकीत वर्तविले होते. महायुती जिंकेल हे तर बहुतांशी ज्योतिषांनी सांगितलेच होते. सुप्रसिद्ध व्यक्तींचे जन्मटिपण समाजमाध्यमात बहुधा खरे किंवा परिपूर्ण नसते. पण याच वरून भाकीत वर्तवण्या खेरीज इलाजही नसतो ज्यामुळे भाकीत चुकते.

ज्योतिषशास्त्रात नष्टजातक म्हणून एक प्रकरण आहे म्हणजेच जन्मवेळ संशोधन. एखाद्या व्यक्तीचे जन्मटिपण नसेल तर ते शोधण्याचा हा पर्याय आहे पण शेवटी पर्यायाच तो. यालाही काही नियम, मर्यादा या असतातच. ऊठसुठ करत बसण्याचा हा मार्ग नाही. एका जातकाने साधारण दीड दोन वर्षा पूर्वी माझ्या कडून जन्मवेळ संशोधन करून घेतले होते पण त्यापूर्वी त्याने अन्य दोन तीन जणांकडून जन्मवेळ संशोधन करून घेतले होते. माझ्या नंतरही अजून कुणा कडून केले असेल. एवढ करूनही त्यांची तक्रार होती कि कुणाच्याच वेळे प्रमाणे काढलेल्या कुंडली वरून भविष्य प्रत्ययास येत नाहीये. ज्योतिषी त्याला ज्ञात पद्धती, ज्ञान व अभ्यासा प्रमाणे काम करत असतो. नियमा नुसार मी जन्मवेळ संशोधना नंतर आयुष्यातील काही घटना ताडून पाहिल्या होत्या असेच अन्य ज्योतिषांनीही केले असणार. असो.

तर या वरून संकल्प आला कि श्री.शिंदे यांचे जन्मवेळ संशोधन करून पहावे. केवळ अभ्यास, सरावासाठी बाकी कोणताही दावा मला करायचा नाही. समाजमाध्यमा मध्ये श्री.शिंदे यांची जन्मतारीख ०९/०२/१९६४ अशी आढळली. जन्मस्थान अहिर. जन्मवेळ दिलेली नाही. श्री.शिंदे तळागाळातून पुढे आलेले व्यक्तीमत्व आहे. एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास झालेला आहे. त्यामुळे सर्वसाधारण तर्काने कुंडलीत राजयोग हवेतच तेही दशमात. ०९/०२/१९६४ च्या मेष लग्न कुंडलीत दशमात बुध, रवी, मंगळ आहेत आणि योगायोग पहा आत्ताची कुंडलीही मेष लग्नाची आहे. झाले तर मग मिटला विषय. श्री.शिंदेंचा जन्म दु. १२ च्या आसपास आहे, नाही का? असा लघुमार्ग हा धोकादायक ठरू शकतो. तसेही आज सवड आहे. आपल्याला योगायोगाने नाही तर योग्ययोगाने प्रयत्न करायचे आहेत. प्रथम शासकग्रह मांडून घेवू या. दिनांक ०७/१२/२०२४, १५:४९:२९ चे शासक खालील प्रमाणे.

LS

शु

L

मं

S

मं

R

D

 

९ तारखेला रविवार होता. वारस्वामी शासकग्रहात नाही. अगोदरचा शनि शासकग्रहात आहे. मग जन्मतारीखही चुकीची आहे का? ती ०८/०२/१९६४ अशी आहे का? शासक शनिची दिप्तांश दशम दृष्टी रविवर असल्याने जन्मवार बरोबर आहे. रवि किंवा चंद्र शासकग्रहात नसल्याने जन्म संधीकाळात झाला असावा. सकाळ कि संध्याकाळ? आता परत शनिची दशम दृष्टी आपल्या मदतीला आली. तर सकाळची वेळ प्रथम तपासून पाहू. ७:०९ चा सूर्योदय होता. मकरलग्न ०५:३२ ते ०७:२३ दरम्यान होते. मकरेचा स्वामी शनि शासकग्रहात आहेच. मकरेत मंगळाचे धनिष्ठा नक्षत्र सका. ०६:५९:२४ ते ०७:२२:३८ दरम्यान होते. यात शनिचा सब हा ०७:१५:२२ ते ०७:२२:३८ दरम्यान होता. मंगळाचा सब सब हा ०७:२०:१० ते ०७:२०:३५ दरम्यान होता. शुक्राचा सब सब सब याचा मध्य ०७:२०:३० घेवूया.  


 
 
      

तारीख खरी आहे असे गृहीत धरून चाललो आहोत. तसे तर शासक शनिने बरोबर असल्याची ग्वाही दिली आहे मग गृहीत का धरतोय? तर शासकग्रह जन्मवेळ करता घेतले होते, जन्मतारखे करता नाही. ठीक आहे आता जी वेळ आपण काढली आहे त्यातील बलस्थाने पाहूयात. जन्मदिनाच्या आदल्या रात्री म्हणजे ८ फेब्रु. ला चंद्र रात्री १०:२१ ला धनुत गेला ते ९ फेब्रु. ला मध्यरात्री १२:५५ पर्यंत तो मूळ नक्षत्री होता. म्हणजे रास आणि नक्षत्राचा प्रश्न नाही. या दिवसी मंगळ, शुक्र उच्चीचे तर गुरु शनि स्वराशीचे होते त्यामुळे कोणतेही लग्न असले तरी राजयोग पक्का आहे. भरीत भर राहू केतू उच्चीचे आहेत. राहू छत्रयोग देतो. येथे तर तो उच्चीचा आहे. म्हणजे पराक्रमी, महत्वाकांक्षी, प्रभावी, यशस्वी असे व्यक्तिमत्व जन्मास घालण्याच्या मूड मध्ये नियती होती तर. यात चार मंदगती तर दोन शीघ्रगती ग्रह आहेत. शनि गुरु सारखे बलाढ्य ग्रह आहेत. शनिची कृपा दृष्टी तर ०७/१०/१९६१ ते ०९/०४/१९६६ तब्बल साडेपाच वर्ष बरसत होती. या दरम्यान गुरुही ०७/०३/१९६३ ते १५/०३/१९६४ एक वर्ष पंचमहापुरुष योग देत होता. गुरुच्या या वर्षात मंगळ १६/१०/१९६३ ते २६/११/१९६३, ०४/०१/१९६४ ते १२/०२/१९६४ दरम्यान. शुक्र १८/०४/१९६३ ते १३/०५/१९६३, ०७/०६/१९६३ ते ०२/०७/१९६३, ०७/१०/१९६३ ते ३१/१०/१९६३, ०५/०२/१९६४ ते ०१/०३/१९६४ या काळात. बुध ३०/०६/१९६३ ते १५/०७/१९६३, २०/०८/१९६३ ते २३/०९/१९६३, ०५/१०/१९६३ ते २५/१०/१९६३ या काळात पंचमहापुरुष योग देत होते. स्पष्टच आहे कि या काळात हजारो/लाखो मनुष्य प्राणी या भूतलावर जन्म घेते झाले असणार. मग ते सर्वच यशस्वी, प्रभावी व्यक्तीमत्वे झाले का नाही? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मे व दुसरी म्हणजे दशाही तश्या यायला हव्यात. पण एखाद्याने कितीही जमीन कसली तरी जमीन सुपीक असेल तर फरक पडणारच आणि दोन्ही असेल पण वरुण राजाची कृपा नसेल तर व्यर्थ. त्यामुळे दैवाच्या भागभांडवलाची महती नाकारून चालणार नाही. डेटा शोधावा लागेल या काळात जन्मलेल्या किती व्यक्ती कोणत्या का होईना क्षेत्रात यश शिखरावर पोहचल्या आहेत.


प्रस्तुत कुंडलीत लाभेश मंगळ लग्नी रूचक योग करतो आहे जो त्यांना अधिपत्य, अधिकार, वर्चस्व देतो आहे. श्री. शिंदे १८ व्या वर्षा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात असे सांगीतले जाते. त्या दरम्यान कुणावर तरी झालेल्या अन्याय विरुद्ध लढतांना त्यांचा सामना स्वर्गीय श्री. आनंद दिघेंशी झाला. जातक त्यांच्या नजरेत भरला व त्यांनी जातकावर किसननगर, ठाणे शाखेचा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. हि घटना १९८४ ची २१ व्या वर्षाची सांगितली जाते. त्या वेळी त्यांना उच्चीच्या दशमेश शुक्राची महादशा चालू होती. अंतर्दशा बहुतेक स्वगृहीच्या लग्नेशाची असावी. शनि अंतर्दशा ३०/०९/१९८४ पर्यंत होती. कुंडलीत भाग्येश बुध लग्नी आहे हा एक उच्चदर्जाचा योग होतो आहे. निर्दोष योगकारक उच्चीच्या शुक्राची भाग्यावर दृष्टी, स्वगृहीच्या गुरूची भाग्यावर, लाभावर दृष्टी. असे भाग्यवर्धक योग कुंडलीत झालेले आहेत. शुक्र बलवान शनिच्या नक्षत्री तर गुरु भाग्येश बुधाच्या नक्षत्री. २५ व्या वर्षा पर्यंत शुक्र महादशा होती. दुसरा मैलाचा दगड म्हणजे १९९७ साली ३४ व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवकाचे तिकीट मिळाले व निवडून आले. चंद्र महादशेत राहू अंतर्दशा ३१/०८/१९९७ पर्यंत होती. चंद्र भाग्यसहम युतीत आहे. भावचलीतात हि युती लाभभावमध्यावर आहे. राहू षष्ठात उच्चीचा.

तिसरा मैलाचा दगड म्हणजे २००४ साली प्रथम विधानसभेचे तिकीट मिळाले. १३/१०/२००४ मतदान होऊन १७/१०/२००४ निकाल लागला व निवडून आले. मंगळ म.द. मंगळ अ.द. राहू विदशा ०९/१० ते ३१/१०/२००४ होती. रूचक मंगळाची महादशा, अंतर्दशा होती. या मंगळाची कमाल म्हणजे २००५ मध्ये शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याचे महत्व म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा आमदार असणाऱ्या व्यक्तीला असे महत्वाचे पद मिळाले होते. त्यानंतर सलग २००९,२०१४,२०१९,२०२४ अश्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. मंत्रीपद हि मिळाले. २००४ व २००९ च्या विधानसभा निवडणुका या मंगळ महादशेत झाल्या. मंगळ महादशा ऑक्टोंबर २०११ मध्ये संपली. चौथा मैलाचा दगड म्हणजे ३०/०६/२०२२ रोजी मुख्यमंत्री झाले व शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे अध्यक्षही. निवडणूक चिन्हंसहित पक्षावर आधिपत्य हे अचंभित करणारे यश लाभले ते राहू महादशेत केतू अंतरदशेत. षष्ठातील उच्चीच्या राहूची करामात.    

त्या काळात पाच पैकी चार ग्रह पंचमहापुरुष योग करण्यास सक्षम होते. त्यामुळे कोणतेही लग्न असले तरी किमान एक पंचमहापुरुष योग होणारच होणार. दशांचा क्रमहि तोच राहणार. मग हेच लग्न का? कोणतेही लग्न असले तरी वरील घटना त्याबर हुकुम सिद्ध करता येतील. तर मास्टर स्ट्रोक असा आहे कि वैदिक ज्योतिषात एक विधान आहे ‘व्ययातील केतू जातकाला आयुष्यात एकदा तरी प्रचंड वैफल्यग्रस्तता, वैराग्य देतो’. हे सर्वश्रुत आहे कि ०२/०६/२००० रोजी दोन आपत्यांचा डोळ्या समोर मृत्यू झाल्यावर श्री.शिंदे प्रचंड वैफल्यग्रस्त झाले होते. त्यांनी बाह्यजगाशी संबंध तोडले होते. दिघे साहेबांनी त्यांना यातून बाहेर काढले होते. मकर लग्नाला केतू व्ययात येतो. उपलब्ध माहितीच्या आधारे जन्मवेळ शोधण्याचा मी फक्त एक प्रयत्न केला आहे.

अनुमान:- श्री. शिंदे यांची जन्मवेळ सका. ०७:२०:३० असावी.  

पुढील लेख :- चुकीला माफी नाही.

          

 

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

काका पुतणे लढत.

 

||श्री||

मागील लेख:- विधानसभा - २०२४ नाशिक.

काका पुतणे लढत.


१९/११/२०२४, २०:३८, केपी नं-५८. अजित पवार VS योगेंद्र पवार लढतीत श्री. अजित पवार यशस्वी होतील का?

जातकाने एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारलेला आहे. जातक ना त्यांच्या मतदार संघात आहे ना काही हितसंबंध आहेत. काही दिवसा पूर्वीही त्यांनी या बाबत पृच्छा केली होती. मी घरी निघायच्या बेतात असतांना त्यांनी पुन्हा एकवार फोन केला. हा प्रश्न मेदनिय पद्धतीने बघता येणार नाही. कारण जातकाने प्रश्न विचारतांना या दोघांच्या लढतीत कोण विजयी होईल अश्या स्वरूपाचा विचारला होता. त्यामुळे हा वैयक्तिक प्रश्न झाला. पण भावातभाव पध्दतीने हि पाहायला गोंधळ होत होता कारण जातकाचे त्यांच्याशी काही नाते संबंधही नाही. अनेक केपी ज्योतिर्विद क्रिकेट सामने, निवडणुका आदी प्रश्न पाहत. मला उशीर हि होत होता म्हणून पूर्व ज्योतीर्विदांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सब वरून झटपट परिक्षण करून त्यांना त्रोटक उत्तर कळवले. आज सवडीने जरा विस्तृत विश्लेषण करून सगळ्यांसाठी अनुमान जाहीर करत आहे. त्यांना खाजगीत उत्तर पाठऊन जर खरे ठरले तर मग स्क्रीनशॉट टाकून मी आधीच सांगितले होते असे  म्हणजे “जंगल मे मोर नाचा किसने देखा” अस म्हणण्याची अलोचकांना संधी देणे. जर भाकीत केले आहेच तर वर्तुळातील दोनचार जणांना पाठवण्यात व खरे झाले तर अचूकतेचा दावा करण्यात काय अर्थ नाही का? म्हणून आज इतर कामे बाजूला ठेवून पोष्ट करत आहे उद्याच्या निकाला पूर्वी. अनेक ज्योतिर्विद भाकीत आधीच जाहीर करत आहे भाकीत खरे ठरो अथवा चुको त्यांचे अभिनंदन. असो मुद्द्या कडे वळूया.     

शासकग्रह – बु, गु, बु, मं. शासक ग्रहात गुरु असल्याने जातकास अपेक्षीत उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. षष्ठाचा सब मंगळ आहे. मंगळ ६ चा बलवान कार्येश आहे. लाभाचा सब गुरु ११ चा बलवान कार्येश आहे. सब श्री. अजित पवार विजयी होतील हे दर्शवित आहे. व्ययाचा सब मंगळ व पंचमाचा सब गुरु आहे. गुरु ११ व १२ दोन्हीचा कार्येश असल्याने तो निर्णायक मत देत नाहीये. व्ययाचा सब मात्र श्री. योगेंद्र पवार यांना अपयश देतो आहे. या लढतीत अजून कोणी आहे का? ते माहित नाही. जातकाने हि दोनच नावे सांगितली. काका-पुतणे असल्याने हि प्रतिष्ठेची लढाई आहे. लग्नेश बुध व सप्तमेश गुरु यांच्यात असलेला अंशात्मक प्रतियोग याचे प्रतिक आहे. बुध शत्रू राशीत तर गुरु परमशत्रू राशीत आहे. पण गुरु शुक्र राशीपरिवर्तनाचे बळ व दुसरे वक्रत्वाचे बळ गुरूला प्राप्त आहे. त्यामुळे मुरलेल्या श्री.अजित पवारांना हि लढत तितकी सहज जाईल असे वाटत नाही. या जागेचा वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे. बुध, गुरु, शनि हे तीन ग्रह भावारंभी आहेत. भाग्येश शनिची लाभ व तृतीया वरील दृष्टी बलवान आहे. शनि हा श्री.अजित पवारांचा भाग्येश असला तरी तो श्री.योगेंद्र पवारांचा पराक्रमेश आहे. श्री.अजित पवारांचा पराक्रमेश रवि मित्र राशीत असला तरी शत्रूच्या नक्षत्री आहे. तर श्री.योगेंद्र पवारांचा पराक्रमेश शनि स्वराशीत असून मित्र राहुच्या नक्षत्री आहे. श्री.योगेंद्र पवार चांगले प्रदर्शन करतील असे वाटत आहे. पण भाग्याची साथ श्री.अजित पवारांना मिळणार आहे.      

अनुमान:- श्री. अजित पवार यशस्वी होतील.

पुढील लेख लवकरच.......

 

 

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

विधानसभा - २०२४ नाशिक.

||श्री||

मागील लेख:- हार पळवला.

विधानसभा - २०२४ नाशिक.


 

 

१६/११/२०२४, १८:४०:१७ नाशिक मध्ये भाजपाचे सीट येतील का?

प्रश्न स्थिर लग्न स्थिर नवमांशावर विचाराला गेला आहे. नाशिक मध्ये एकूण १५ विधानसभा मतदारसंघ येतात. आपण नाशिक शहरा करता प्रश्न पाहत आहोत. नाशिक शहरात ३ विधानसभेच्या जागा आहेत. नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अश्या त्या जागा आहेत. २०१९ मध्ये या तिन्ही जागा भाजपा कडे होत्या. नाशिक पूर्व – श्री. राहुल ढिकले. नाशिक मध्य – सौ.देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम – सौ.सीमा हिरे विजेते झाले होते. या वेळीही महायुती कडून तिन्ही जागा भाजपाच लढणार आहेत. भाजपाने तिन्ही जागी पूर्व विजते उमेदवारच दिले आहेत काहीही बदल केलेला नाही. महाविकास आघाडीने नाशिक पूर्व मधून श्री.गणेश गीते (शरद पवार गट), नाशिक मध्य – श्री.वसंत गीते (ठाकरे गट) तर नाशिक पश्चिम – श्री.सुधाकर बडगुजर (ठाकरे गट) असे उमेदवार दिले आहेत. प्रश्न स्थिर लग्न स्थिर नवमांशावर विचारला गेला आहे हे आपण पाहिले आहेच. दशमेश शनि दशमात स्वत:च्या स्थिर राशीत आहे. नाशिक मध्ये भाकरी फिरणार नसल्याचे संकेत हे योग देत आहे. शनि कालच मार्गी झालेला आहे. हा शनि महायुतीला मोठे स्मरणीय यश देवू शकतो पण हा शनि पापकर्तरीत असल्याने त्याची बलवत्ता कमी होत आहे. त्यामुळे सहयोगी पक्षांचा हवा तसा सहयोग मिळणार नाही.

विरोधी पक्ष फारसा बलवान नाही. रवि मित्र राशीत असला तरी त्याने अगदी नुकताच राशी प्रवेश केला आहे. राशीस्वामी मंगळाचा निचभंग बलवान चंद्रा कडून व शनि कडून होतो आहे. रविच्या अंशात्मक प्रतियोगातील वक्री हर्शल मुळे जनतेच्या अचानक फिरलेल्या लहरी चा फटका काही विरोधकाना बसू शकतो. चतुर्थ स्थानही पापकर्तरीत आहे. दशमाच्या पापकर्तरी पेक्षा चतुर्थाची पापकर्तरी तर अधिक धारदार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील लढत दोन्ही बाजूच्या घटकपक्षांच्या स्वबळावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. बघुया, पुढच्या शनिवारी उमेदवारां बरोबर आपल्या भाकीताचाही निकाल लागणार आहे. भाकितात एक उणीव आहे ती म्हणजे उमेदवारांच्या वैयक्तिक कुंडल्या अभ्यासल्या नाहीयेत.

 


 


षष्ठाचा व लाभाचा सब राहू मार्गी शनिच्या नक्षत्री व शुक्राच्या सब मध्ये आहे. शुक्र केतूच्या नक्षत्री. राहू चवथ्या पायरीवर विरोधकांना अनुकूल ५ चा बलवान कार्येश होतो आहे. राहू लाभात असला व त्याचा सब शुक्र षष्ठेश असला तरी हे कार्येशत्व बलवान नाही. सब राहू प्रतिस्पर्धी विजयी होणार असल्याचे संकेत देत आहे. व्ययाचा व पंचमाचा सब गुरु वक्री असला तरी तो मार्गी मंगळाच्या नक्षत्री व राहुच्या सब मध्ये आहे. गुरु विरोधकांना अनुकूल भावांचा तसेच पूर्व निर्वाचित उमेदवारांना अनुकूल भावांचा बलवान कार्येश नाही. गुरुचा नक्षत्रस्वामी मंगळाची षष्ठावर अंशात्मक चतुर्थ दृष्टी असल्याने हि बलवान दृष्टी मानली जाईल. सब गुरु प्रतीस्पर्धींना अनुकूल नाही मात्र पूर्व निर्वाचीतांना सेफ पॅसेज देत आहे. या वरून असे अनुमान काढता येईल कि तुंबळ लढाई होईल व पूर्व निर्वाचित यशस्वी होतील पण चमत्कार वगैरे होणार नाही. दोन्ही बाजूंचे पारंपारिक किंवा अपेक्षीत मतदार दान दुसऱ्याच्या झोळीत टाकतील, पण हे दोन्ही बाजूंनी होणार असल्याने अटीताटीच्या सामन्यात पूर्व निर्वाचित बाजी मारून गड राखण्यात यशस्वी होतील.

पुढील लेख:-लवकरच........... 

 

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

हार पळवला.

||श्री||

मागील लेख:- लाटेवर स्वार किलाटेवर मात?


हार पळवला



१९/०८/२०२४ ला सोमवारी रक्षाबंधन निमित्ताने साधारण २ तोळ्याची माळ गळ्यात घातली होती. घरी आलेले पाहुणे वगैरे गेल्यावर रात्री ८:३० ला घरच्यां बरोबर फोटो काढला त्यात ती माळ होती. दुसऱ्या दिवशी (२०/०८/२०२४) संध्या ४:०० वाजता बाहेर जातांना गळ्यात माल नसल्याचे लक्षात आले. बाहेर जायची घाई असल्याने असेल घरात, ठेवली असेल कुठे असा विचार करून निघून गेले. झोपतांना उशासी ठेवते पण सोमवारी रात्री झोपताना काढून ठेवली कि नाही ते आठवत नाही. बेडखाली, बेडमध्ये सर्व ठिकाणी तपासले. घरात सगळीकडे तपासले.  

è २० तारखेला मंगळवारी पहाटे ०५:३५ ते बुधवारी पहाटे ०३:०० पर्यंत शततारका नक्षत्र होते. वस्तू नसल्याचे लक्षात तर याच नक्षत्रात आले. याच नक्षत्रात वस्तू हरवली असावी. शततारका नक्षत्र मंद लोचनी असल्याने वस्तू दक्षिनेकडे सापडते. शततारका ऊर्ध्वमुखी आहे.

माझ्या कडे जातक २१/०८/२०२४ ला दुपारी १२:००:३४ वाजता आल्या होत्या. लग्नेश शुक्र लाभात लाभेश रवि व भाग्येश बुध युक्त आहे. लग्नेश तर उत्तम स्थितीत आहे. धनेश सप्तमेश मंगळ अष्टमात असल्याने वस्तू चोरीला गेली असावी अशी शक्यता आहे. मंगळ तृतीयेश/षष्ठेश गुरु युतीत आहे. जातक बाहेर वा शेजारी पाजारी गेली नाही असे म्हणत होती. फक्त दुध आणायला गेली होती. षष्ठेश गुरुचा विचार करता मग नोकरांच्या ताब्यात वस्तू असावी असे म्हणावे लागेल. मंगळ अष्टमात असल्याने कचरा वगैर विचारले असता तो तपासला असे म्हणाल्या. त्यांचे स्वच्छतागृह दक्षिनेस असल्याने तिथे तपास करायला सांगितले.

L शु,  S गु(रा), R ,  D बु(के).  लाभाचा सब रवि केतूच्या नक्षत्री आहे.

रवि – १०, न.स्वा. के- ११(बु-१०/९,१२), सब चं- ५, न.स्वा. गु- ८/३,६

गुरूची व्दितीयावर अंशात्मक दृष्टी आहे. तसेच व्दितीयाचा बलवान कार्येश मंगळाच्या युतीत गुरु आहे. त्यामुळे रवि बऱ्यापैकी २ चा कार्येश होतो आहे. चंद्राचीही लाभावर दिप्तांश दृष्टी आहे. त्यामुळे दागिना सापडेल अशी आशा करायला हरकत नाही. रवि जातकास अनुकूल असलेल्या १,२,३,६,१०,११ पैकी ३,६,१०,११ चा बलवान कार्येश आहे तर ४,५,७,८,९,१२ या दुसऱ्या किंवा चोरास अनुकूल असलेल्या भावांपैकी ५,८,९,१२ चा कार्येश आहे. त्यामुळे लाभाचा सब स्पष्ट काही सांगत नाही.



वस्तू हरवली कि चोरीला गेली ते पाहू? दागिना असल्याने व्दितीयाचा सब घेवू या. व्दितीयाचा सब चंद्र आहे. चंद्र ८ चा कार्येश असल्याने दागिना चोरीस गेलेला असण्याची शक्यता आहे. चंद्र २,३,६,१०,११ या अनुकूल तर ४,५,८,९,१२ या प्रतिकूल भावांचा कार्येश आहे.



सप्तमाचा सब शनि असल्याने वृद्ध किंवा जास्त वय असलेली व्यक्ती असू शकते. ६ भाव नोकर तर ८ भाव सफाई कर्मचारी दर्शवितो. २ भाव कुटुंबातील व्यक्ती तर ३ भाव लहान भावंडे किंवा निरोप्याचे काम करणारी व्यक्ती. ४ भाव घरातील व्यक्ती किंवा घराच्या आवारात राहणारी व्यक्ती. पाहुणे गेल्या नंतरच्या फोटोत हार होता. त्यामुळे घरातीलच एखाद्या व्यक्तीला किंवा सफाई कामगाराला हार मिळाला असावा असे वाटते. शनि ५,९,११ चा कार्येश नसल्याने संतती, सून/जावाई, नातवंड यांचा विचार करता येणार नाही. मंगळ ८/२,७    चा कार्येश आहे. जातकाचे पती अर्धांगवायुने पिडीत असून त्यांच्या हालचाली मर्यादित आहेत. त्यामुळे संशयाची सुई सफाई कामगारावर येते आहे. परंतु घरात कोणी सफाई कामगार किंवा मोलकरीण वगैरे नाही. व्दितीयाचा सब हार चोरीस गेल्याचे दर्शवित आहे पण आपल्याला कुंडली वरून चोर शोधता येत नाहीये. वस्तू तर मिळणार आहे तेव्हा पूर्ण घराची दक्षिण दिशेस परत एकदा शोध घ्यावा असे सांगितले.

चर लग्न असून बहुतेक ग्रह २,६,११ पैकी कार्येश आहेत. वस्तू लवकर मिळायला हवी. चंद्र २३ ऑग. १९:४४ ते २५ ऑग. २२:२० दरम्यान मेषेत म्हणजे सप्तम केंद्रात असणार आहे. या दरम्यान दागिना मिळायला हवा. शनि बुध वक्री आहेत तर राहू शनीच्या नक्षत्री. गुरु, शुक्र केतू हे शासक राहतात. तुळेत गुरुचे नक्षत्र व धनुत केतू, शुक्राचे नक्षत्र यांचा विचार करावा लागेल. तुळेत गुरुच्या नक्षत्री चंद्र ८ सप्टें दु. ०३:२० ते ९ सप्टें दु. ०५:५३ दरम्यान असणार आहे. १८ दिवसांनी हे गोचर सापडणार आहे. तर धनुत केतूच्या नक्षत्री ११ सप्टें रात्री ०९:११ ते १२ सप्टें रात्री ०९:४२ दरम्यान म्हणजे २१ दिवसांनी. हा तसा उशीर होईल. मेषेचा मंगळ शासकात नाही पण गुरुच्या युतीत असल्याने त्याचा विचार करू.  चंद्र मेषेत केतूच्या नक्षत्री २३ ऑग. साय.०७:४५ ते २४ ऑग. साय. ०५:५८ दरम्यान वस्तू मिळायला हवी. व्दितीयावर गुरूची दृष्टी असल्याने वस्तू मिळायला हवी.



              २१/०८/२०२४,१८:२३ ता.क. – तुमच्या कडून आल्यावर लगेच तुम्ही सांगितल्या प्रमाणे शोध सुरु केला. दक्षिणेस हॉल व किचन आहे. प्रत्येक वस्तू काढून शोध घेत होते. साधारण ६ च्या आसपास हार सापडला. किचन ओट्यावर गॅसखाली होता. उंदराने ओढून नेला होता. घरात एक उंदीर घुसलेला होता. त्याचा बंदोबस्तासाठी उपाय केला होता पण सापडत नव्हता. हार थोडा कुरतडला आहे.

पुढील लेख लवकरच.......

 

शुक्रवार, ३१ मे, २०२४

लाटेवर स्वार कि लाटेवर मात ?

 

||श्री||

मागील लेख:- बघ माझी आठवण येते का? भाग-२

 

लोकसभा मतदान नाशिकला २० मे रोजी झालेलं आहे. ४ जूनला निकाल आहे. आपल्या कडे अध्यक्षीय पद्धत नसली तरी श्री.मोदी पंतप्रधानपदी या लक्षावर गेल्या काही निवडणुका पार पडत आहे व त्यात भाजपाला यश हि आलेलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार कि नाही? या वर अनेक ज्योतिर्विदांनीही मते मांडलेली आहेत. मी त्यावर माझे मत मांडत नाहीये कारण ‘येणार तर मोदीच’ याचा इतका प्रचार झाला आहे कि जनमानसावर या प्रचाराचा असलेला प्रभाव पुसण्यात विरोधी पुरेसे यशस्वी झाले असे वाटत नाही. नेहरू, गांधी घराण्या नंतर सध्या मोदी लाट आहे. आपली सांसदीय निवडणूक प्रक्रिया काहीही असली तरी एखाद्या नेत्याची लाट असली कि त्या पक्षाचे उमेदवार त्या लाटेवर निवडून येण्याची शक्यता असते हे नेहरू, गांधी, मोदी लाटेने या पूर्वीच सिद्ध केलेले आहे. तरीही सर्वचे सर्व उमेदवार काही लाटेवर स्वार होऊन निवडून येत नाही हे हि खरे. काही लाटेवर मात करून निवडून येतात. मी माझ्या नाशिक मतदार संघातील उमेदवार लाटेवर स्वार होऊन निवडून येणार कि लाटेवर मात करून निवडून येणार हे ज्योतिष मार्गाने चाचपडण्याचे ठरवले. सोशल मिडीया वरील बेभरोसे जन्मटिपण घेवून त्या वरून भाकीत करण्यापेक्षा होरारी नंबर वरून भकित करणे मला जास्त श्रेयस्कर वाटले. उमेदवार तर बरेच आहेत पण सगळ्यांचा विचार करण्या पेक्षा ज्यांची चर्चा आहे त्यांचाच विचार केला आहे. त्यामुळे चार उमेदवारांचा विचार मी येथे केला आहे. सुविधेसाठी मेष लग्न कुंडली देत आहे.



२७/०५/२०२४,१७:५१:१७, होरारी नं- २११ श्री.हेमंत गोडसे. कुंभ लग्न ४/५३’/२०” वर आहे. हे NDA चे उमेदवार असल्याने यांचा विचार प्रथम केला. षष्ठाचा सब शनि मार्गी गुरुच्या नक्षत्रात आहे. शनि- १/१२ न.स्वा. गुरु- ३, सब बुध- ... न.स्वा. शुक्र- ३/४,९  षष्ठाचा सब शनि ६,१०,११ पैकी कार्येश नाही. म्हणजे सदर उमेदवार निवडून न येण्याची शक्यता आहे. व्ययाचा सब शनि प्रतीस्पर्धीस अनुकूल ४,१२ चा बलवान कार्येश असल्याने प्रतीस्पर्धी उमेदवारांपैकी कुणी निवडून येवू शकतो.

२७/०५/२०२४,१८:११:२७ होरारी नं- १०१ श्री.राजाभाई वाजे. सिंह लग्न २५/५३’/२०” वर आहे. महाआघाडीच्या या उमेदवाराची जास्त चर्चा होती. षष्ठाचा सब गुरु रविच्या नक्षत्री आहे. गुरु- --, न.स्वा. रवि- ९, सब बुध- ९, न.स्वा. शुक्र- ९/३,१० सब गुरु ६,१०,११ पैकी १० चा बलवान कार्येश आहे. म्हणजे सदर उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. व्ययाचा सब गुरूच आहे तो ४,५,१२ पैकी बलवान कार्येश नाही. खरे तर चुरस या पहिल्या दोघा उमेदवारां मध्ये असल्याने व या उमेदवाराच्या षष्ठाच्या व व्ययाच्या सबने स्पष्ट निर्देश केले असल्याने पुढे काही पहाण्याची आवश्यकता नव्हती पण चार उमेदवारांची नावे मनात असल्याने पाहून घेवू.

२७/०५/२०२४,१८:२२:३९, होरारी नं- १० श्री.शांतीगिरीजी महाराज. मेष लग्न १३/२०’/००” वर आहे. षष्ठाचा सब बुध मार्गी शुक्राच्या नक्षत्री आहे. बुध- ... न.स्वा. शुक्र- १/२,, सब शनि- ११ न.स्वा.गुरु- १. सब बुध ११ चा बलवान कार्येश आहे. उमेदवार तर एकच निवडून येईल ना?  इथेही व्ययाचा सब बुधच आहे तो ४,५,१२ पैकी बलवान कार्येश नाही. व्ययाचा सब कार्येश असता तर सोपे झाले असते.       

२७/०५/२०२४,१८:५५:२५, होरारी नं- ७१ श्री.सिद्धेश्वरानंद महाराज. कर्क लग्न ११/००’/००” वर आहे. षष्ठाचा सब बुध- -- न.स्वा.शुक्र- १०,११/४ सब शनि- ८/७ न.स्वा.गुरु- १०. सब बुध १०,११ चा बलवान कार्येश असल्याने सदर जातक निवडून येण्याची शक्यता आहे. व्ययाचा सब शनि- ८/७ न.स्वा.गुरु- १०. सब बुध- -- न.स्वा.शुक्र- १०,११/४. व्ययाचा सब शनि ४ चा बलवान कार्येश आहे. म्हणजे प्रतिस्पर्धीही तुल्यबळ आहे आणि चवथ्या पायरीवर व्ययाचा सब ४ चा कार्येश आहे. यश मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.  

नंबर १ चा उमेदवार येथील ज्योतिष गणने नुसार अपयशी ठरण्याची शक्यता आहे. नंबर ४ च्या उमेदवाराचा व्ययाचा सब ४ चा बलवान कार्येश असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कुंडलीवर अवलंबून आहे व इतर दोन उमेदवारांच्या कुंडलीत यशाची शक्यता अधिक असल्याने नंबर ४ स्पर्धेतून बाहेर पडत आहे. आता नंबर २ व ३ चा विचार करू. नंबर २ चा षष्ठाचा सब गुरु असून तो रवि सारख्या सत्ताकारक ग्रहाच्या नक्षत्री आहे तर नंबर ३ चा सब बुधा सारखा ग्रह असल्याने या मुद्यावर नंबर २ बाजी मारत आहे. दुसरा मुद्दा असा कि नंबर २ चा षष्ठाचा सब १० चा बलवान कार्येश चवथ्या पायरीवर आहे तर नंबर ३ चा षष्ठाचा सब ११ सारख्या महत्वाच्या भावाचा बलवान कार्येश असला तरी तो तिसऱ्या पायरीवर आहे. त्यामुळे मला इथेही नंबर २ बाजी मारत आहे असे वाटते आहे. बघुया घोडा मैदान जवळ आहे.

निष्कर्ष :- महाआघाडीचे उमेदवार श्री.राजाभाई वाजे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.

पुढील लेख:- हार पळवला.




 

 

सोमवार, २५ मार्च, २०२४

बघ माझी आठवण येते का? भाग- २

 

||श्री||

मागील लेख :- बघ माझी आठवण येते का? भाग-१.


बघ माझी आठवण येते का? भाग- २




“जा सिमरन जी ले अपनी जिंदगी|” अस म्हणणारा प्रियेशीचा बाप सगळ्यांच्याच नशिबी नसतो. केवळ एका व्यक्ती मुळे दोन प्रेमी जीवांची कायमची ताटातुट झाली. 

शशीने त्याची जी प्रेमकथा सांगितली त्यावरून असे वाटते कि ज्युलीचे शशी वर खरे प्रेम असावे कारण तिने केवळ स्वत:च्या किंवा शशीच्या प्रेमाचा, भावनांचा, जीवाचा विचार न करता त्याच्या कुटुंबीयांवरही आपल्यामुळे काही संकट न येवो म्हणून प्रेमाचा त्याग प्रेमा पोटी केला. प्रेमभंगाचे दुख:, नैराश्य आपण समजू शकतो. ३० व्या वर्षी सुरु झालेली प्रेम कहाणी ३२ व्या वर्षी समाप्त झाली, हि प्रेम कहाणी काही टीन एजर वयातली नाही कि काही अविचार केला किंवा भावनिक असंतुलन व्हावे. प्रेम असफल झाल्यावर शशीने घेतलेली भूमिका खेदजनक आहे. आजच्या काळात परो पारोचा घोष करत देवदास बनून फिरण्याची कोणीही अपेक्षा निश्चितच करणार नाही. त्यामुळे कालांतराने घरच्यांच्या समजावणी नंतर जातकाने विवाहाचा घेतलेला निर्णय स्वागताहार्यच होता. दुर्दैवाने तो ठरलेला विवाहही संपन्न होऊ शकला नाही. पण या पेक्षा दुखद शेवटच्या भेटीच्या वेळी शशीने ज्युलीशी व्यक्त केलेली त्याची आंतरिक भावना. आपले प्रेम सफल झाले नाही, तू साथ देत नाही पण आपण या पुढे निदान केवळ चांगले मित्र राहूया अशी भावना व्यक्त केली असती तर काही गैर वाटले नसतेही कदाचित. “कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तडपता हुआ जब कोई छोड दे, तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुला हि रहेगा तुम्हारे लिये|” असे खात्री वजा अश्वासन दिले असते तर ते एक वेळ भावनेच्या भरात समजू शकलो असतो. पण हे हि तसे योग्य नाही. विफल प्रेमा नंतर तुम्ही कुणाशी संसार थाटणार आहात आणि दार अश्या प्रेमी साठी खुले ठेवाणार आहात जी तुमचे प्रेम नाकारून गेली आहे. यात तुमच्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या त्या दुसऱ्या चाकाचा काय दोष? तिच्याशी प्रतारणा का? का तिचा विश्वासघात?
 
असो आपण आपल्या विषया कडे परतू या. शेवटच्या भेटीत शशीने जे व्यक्त केले ते खेद जनक होते ते म्हणजे जातकाने प्रेम संबंध अबाधित ठेवण्या विषयी विचारले स्पष्ट म्हणजे विवाहबाह्य संबंधाची अपेक्षा जातक मनी धरून होता आणि आहे. ज्युलीला मैत्री टिकवायची होती पण शशीने गैरसमजाने म्हणा किंवा उद्विग्नतेने म्हणा किंवा वैफल्यग्रस्ततेने म्हणा त्याचा चुकीचा अर्थ काढला. मग ती भेट शेवटची ठरण्यात आणि नंतर शशीने ज्युलीशी संपर्क करण्याच्या प्रयत्नांना तिने प्रतिसाद न देणे हे तिने बरोबरच केले. प्रेमातही तिने मर्यादा ओलांडली नव्हती आणि आताही मना विरुद्ध का होईना स्वीकारलेल्या जोडीदाराशी प्रतारणा केली नाही. शशीही त्याचे स्वत:चे ब्रम्हचर्य अजून भंग न झाल्याची खात्री देतो आहे. आपले प्रेम आपल्याला मिळत नाही म्हटल्यावर अशी वासना, विकृती जातकाच्या मनात का आली? मनकारक चंद्राचा राहूशी असलेला संबंध. तुळेचा चंद्र राहुच्या नक्षत्री आहे. त्यामुळे नीती/अनीती, नैतिक/अनैतिक, कायदे/बेकायदे कसे हि पण मला मिळावे हि भावना निर्माण झाली. त्यात व्ययातील मंगळाच्या राशीतील शुक्र, लाभातील नीचेचा रवी यांची भर. प्रेमात शुचिता पाळली पण प्रेमभंग झाल्यावर प्रेमातील उदात्तता का गेली? कारण आत्मबल, निग्रह कमी पडला कारक रवि निच असल्याने.   

शशीच्या या विचारांमुळे म्हणा किंवा नशीब म्हणा पण पुन्हा एकदा जातकाचा हिरमोड झाला. प्रेमाच्या विफलते नंतर साधारण १० महिन्यांनी म्हणजे २२/०१/२०२३ च्या आसपास ३३ व्या वर्षी शशीचा विवाह ठरला, ज्याचा उल्लेख वरती केला आहे. या वेळी शनि म.द. चंद्र भुक्ती शुक्र विदशा ११/१२/२०२२ ते १७/०३/२०२३ दरम्यान होती. यांचे कार्येशत्व आपण पाहिले आहेच, मिश्र कार्येशत्व आहे. त्यामुळे ज्या दिशेने प्रयत्न झाले तसे फळ मिळाले. (अजून सुक्ष्म पहायचे असेल तर राहू सुक्ष्मदशा १४ ते २९ जाने. दरम्यान होती.) १२/०६/२०२३ हा शनि म.द. मंगळ अ.द. राहू विदाशेतील (९ मे ते ९ जुलै २०२३) मुहूर्त ठरला. मंगळाचे हि ,५,,१०,११ असे मिश्र कार्येशत्व आहे, तसेच राहूचे ,२,५,,१०,११. मुहूर्त गाठण्या अगोदरच विघ्न आले. 

याच राहुच्या विदशेत २२ मे ला शशीच्या वधूचा त्याला फोन आला कि “तू वेगळे घर घे, आपण स्वतंत्र राहू नाहीतर मी एका वर्षात घटस्फोट घेईल.” अरे हे काय वागण झाले? पसंती देण्या आगोदर तुम्ही एकमेकांना भेटला होतात तेव्हाच हे का बोलली नाही कि मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. विवाह ठरवून गोष्टी इतक्या पुढे गेल्यावर हि मुलगी असे बोलते आहे. अजून लग्नघटीपात्र भरले नाही तोच घटस्फोटाच्या धमक्या? लग्नाला होकार देण्यापूर्वी भेटीत तू तुझ्या आपेक्षा का सांगितल्या नाहीत कि या मुलीला दुसरे एखादे उजवे स्थळ आले ज्याचा हिला लोभ सुटला. २७/२८ मे ला बैठक होऊन या वर पडदा पडला खरा व ठरल्या प्रमाणे विवाह पार पाडायचे ठरले पण परत एकदा अपमान नाट्याने डोके वर काढले. 

या वेळीही वधूचे पिताच कारणीभूत झाले. २ जूनला विवाहविधी विषयी विहिणी विहिणीचे फोन वर बोलणे चालू असतांना होणारे सासरे काही तरी अपमानजनक बोलून गेले आणि ३ जून ला जातकाने शेवटी ९ दिवसांवर आलेला विवाह एकदाचा मोडला. दशानाथांचे मिश्र कार्येशत्व दोन्ही अनुभवाला आले. प्रयत्न अनुकूलते साठी असतांना विरोधी कार्येशत्व कार्यरत कसे झाले? याला कारण जातकाच्या मनात असलेली वासना, विकृती तर कारणीभूत नाही झाली? शशीला आता असे वाटते कि माझे प्रेम मला परत मिळणार असावे म्हणून नियतीने हा विवाह मोडला. तिचा संसार कसा चालू आहे? तिला काही मुलबाळ आहे का? याविषयी शशीला काहीच माहित नाही असे तो म्हणत होता. ज्युलीच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. त्या वेळी बाकी सर्व पाठींबा देत असतांना एका व्यक्तीचा विरोध मोडून विवाह करू शकले नाही. ती त्या वेळी दोन्ही कुटुंबाचा पाठींबा असतांना वडिलांचा दबाव, दहशतीवर मात करू शकली नाही आणि आता जातक हि अभिलाषा बाळगतो आहे कि ती माझ्या जीवनात परत येईल. तिचा घटस्फोट वगैरे होण्याची काही शक्यता आहे का? हे अनैतिक आहे. यात काहीच दोष नसलेला तिचा पती, जर संतती असेल तर ती यांची होरपळ का करायची? तिच्या वैवाहिक जीवनात काही समस्या यावी आणि तिने माझ्या कडे परत यावे किंवा विवाहबाह्य संबंध ठेवावे अशी कल्पना देखील करणे हे निर्मळ प्रेमाचे लक्षण खचित नाही. टिव्ह, ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म वरील मालिकांचा प्रभाव हा. विफल प्रेमाचे दु:ख स्वत: श्रीकृष्णांनी देखील पचवले ना? श्रीराधेच्या विवाहा नंतर ते फिरून तिच्या जीवनात गेले नाही कि न तिचे अकल्याण चिंतिले.

काही वर्षांपूर्वी ‘गारवा’ नावाचा मराठी कविता अधिक गाण्यांचा एक अल्बम खूप लोकप्रिय झाला होता. त्यातील एक गाणे या स्थितीवर चपलख बसते. सोबत त्याची लिंक देवून विराम घेतो. 


 

पुढील लेख:- लाटेवर स्वार कि लाटेवर मात?