सोमवार, २५ मार्च, २०२४

बघ माझी आठवण येते का? भाग- २

 

||श्री||

मागील लेख :- बघ माझी आठवण येते का? भाग-१.


बघ माझी आठवण येते का? भाग- २




“जा सिमरन जी ले अपनी जिंदगी|” अस म्हणणारा प्रियेशीचा बाप सगळ्यांच्याच नशिबी नसतो. केवळ एका व्यक्ती मुळे दोन प्रेमी जीवांची कायमची ताटातुट झाली. 

शशीने त्याची जी प्रेमकथा सांगितली त्यावरून असे वाटते कि ज्युलीचे शशी वर खरे प्रेम असावे कारण तिने केवळ स्वत:च्या किंवा शशीच्या प्रेमाचा, भावनांचा, जीवाचा विचार न करता त्याच्या कुटुंबीयांवरही आपल्यामुळे काही संकट न येवो म्हणून प्रेमाचा त्याग प्रेमा पोटी केला. प्रेमभंगाचे दुख:, नैराश्य आपण समजू शकतो. ३० व्या वर्षी सुरु झालेली प्रेम कहाणी ३२ व्या वर्षी समाप्त झाली, हि प्रेम कहाणी काही टीन एजर वयातली नाही कि काही अविचार केला किंवा भावनिक असंतुलन व्हावे. प्रेम असफल झाल्यावर शशीने घेतलेली भूमिका खेदजनक आहे. आजच्या काळात परो पारोचा घोष करत देवदास बनून फिरण्याची कोणीही अपेक्षा निश्चितच करणार नाही. त्यामुळे कालांतराने घरच्यांच्या समजावणी नंतर जातकाने विवाहाचा घेतलेला निर्णय स्वागताहार्यच होता. दुर्दैवाने तो ठरलेला विवाहही संपन्न होऊ शकला नाही. पण या पेक्षा दुखद शेवटच्या भेटीच्या वेळी शशीने ज्युलीशी व्यक्त केलेली त्याची आंतरिक भावना. आपले प्रेम सफल झाले नाही, तू साथ देत नाही पण आपण या पुढे निदान केवळ चांगले मित्र राहूया अशी भावना व्यक्त केली असती तर काही गैर वाटले नसतेही कदाचित. “कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तडपता हुआ जब कोई छोड दे, तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुला हि रहेगा तुम्हारे लिये|” असे खात्री वजा अश्वासन दिले असते तर ते एक वेळ भावनेच्या भरात समजू शकलो असतो. पण हे हि तसे योग्य नाही. विफल प्रेमा नंतर तुम्ही कुणाशी संसार थाटणार आहात आणि दार अश्या प्रेमी साठी खुले ठेवाणार आहात जी तुमचे प्रेम नाकारून गेली आहे. यात तुमच्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या त्या दुसऱ्या चाकाचा काय दोष? तिच्याशी प्रतारणा का? का तिचा विश्वासघात?
 
असो आपण आपल्या विषया कडे परतू या. शेवटच्या भेटीत शशीने जे व्यक्त केले ते खेद जनक होते ते म्हणजे जातकाने प्रेम संबंध अबाधित ठेवण्या विषयी विचारले स्पष्ट म्हणजे विवाहबाह्य संबंधाची अपेक्षा जातक मनी धरून होता आणि आहे. ज्युलीला मैत्री टिकवायची होती पण शशीने गैरसमजाने म्हणा किंवा उद्विग्नतेने म्हणा किंवा वैफल्यग्रस्ततेने म्हणा त्याचा चुकीचा अर्थ काढला. मग ती भेट शेवटची ठरण्यात आणि नंतर शशीने ज्युलीशी संपर्क करण्याच्या प्रयत्नांना तिने प्रतिसाद न देणे हे तिने बरोबरच केले. प्रेमातही तिने मर्यादा ओलांडली नव्हती आणि आताही मना विरुद्ध का होईना स्वीकारलेल्या जोडीदाराशी प्रतारणा केली नाही. शशीही त्याचे स्वत:चे ब्रम्हचर्य अजून भंग न झाल्याची खात्री देतो आहे. आपले प्रेम आपल्याला मिळत नाही म्हटल्यावर अशी वासना, विकृती जातकाच्या मनात का आली? मनकारक चंद्राचा राहूशी असलेला संबंध. तुळेचा चंद्र राहुच्या नक्षत्री आहे. त्यामुळे नीती/अनीती, नैतिक/अनैतिक, कायदे/बेकायदे कसे हि पण मला मिळावे हि भावना निर्माण झाली. त्यात व्ययातील मंगळाच्या राशीतील शुक्र, लाभातील नीचेचा रवी यांची भर. प्रेमात शुचिता पाळली पण प्रेमभंग झाल्यावर प्रेमातील उदात्तता का गेली? कारण आत्मबल, निग्रह कमी पडला कारक रवि निच असल्याने.   

शशीच्या या विचारांमुळे म्हणा किंवा नशीब म्हणा पण पुन्हा एकदा जातकाचा हिरमोड झाला. प्रेमाच्या विफलते नंतर साधारण १० महिन्यांनी म्हणजे २२/०१/२०२३ च्या आसपास ३३ व्या वर्षी शशीचा विवाह ठरला, ज्याचा उल्लेख वरती केला आहे. या वेळी शनि म.द. चंद्र भुक्ती शुक्र विदशा ११/१२/२०२२ ते १७/०३/२०२३ दरम्यान होती. यांचे कार्येशत्व आपण पाहिले आहेच, मिश्र कार्येशत्व आहे. त्यामुळे ज्या दिशेने प्रयत्न झाले तसे फळ मिळाले. (अजून सुक्ष्म पहायचे असेल तर राहू सुक्ष्मदशा १४ ते २९ जाने. दरम्यान होती.) १२/०६/२०२३ हा शनि म.द. मंगळ अ.द. राहू विदाशेतील (९ मे ते ९ जुलै २०२३) मुहूर्त ठरला. मंगळाचे हि ,५,,१०,११ असे मिश्र कार्येशत्व आहे, तसेच राहूचे ,२,५,,१०,११. मुहूर्त गाठण्या अगोदरच विघ्न आले. 

याच राहुच्या विदशेत २२ मे ला शशीच्या वधूचा त्याला फोन आला कि “तू वेगळे घर घे, आपण स्वतंत्र राहू नाहीतर मी एका वर्षात घटस्फोट घेईल.” अरे हे काय वागण झाले? पसंती देण्या आगोदर तुम्ही एकमेकांना भेटला होतात तेव्हाच हे का बोलली नाही कि मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. विवाह ठरवून गोष्टी इतक्या पुढे गेल्यावर हि मुलगी असे बोलते आहे. अजून लग्नघटीपात्र भरले नाही तोच घटस्फोटाच्या धमक्या? लग्नाला होकार देण्यापूर्वी भेटीत तू तुझ्या आपेक्षा का सांगितल्या नाहीत कि या मुलीला दुसरे एखादे उजवे स्थळ आले ज्याचा हिला लोभ सुटला. २७/२८ मे ला बैठक होऊन या वर पडदा पडला खरा व ठरल्या प्रमाणे विवाह पार पाडायचे ठरले पण परत एकदा अपमान नाट्याने डोके वर काढले. 

या वेळीही वधूचे पिताच कारणीभूत झाले. २ जूनला विवाहविधी विषयी विहिणी विहिणीचे फोन वर बोलणे चालू असतांना होणारे सासरे काही तरी अपमानजनक बोलून गेले आणि ३ जून ला जातकाने शेवटी ९ दिवसांवर आलेला विवाह एकदाचा मोडला. दशानाथांचे मिश्र कार्येशत्व दोन्ही अनुभवाला आले. प्रयत्न अनुकूलते साठी असतांना विरोधी कार्येशत्व कार्यरत कसे झाले? याला कारण जातकाच्या मनात असलेली वासना, विकृती तर कारणीभूत नाही झाली? शशीला आता असे वाटते कि माझे प्रेम मला परत मिळणार असावे म्हणून नियतीने हा विवाह मोडला. तिचा संसार कसा चालू आहे? तिला काही मुलबाळ आहे का? याविषयी शशीला काहीच माहित नाही असे तो म्हणत होता. ज्युलीच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. त्या वेळी बाकी सर्व पाठींबा देत असतांना एका व्यक्तीचा विरोध मोडून विवाह करू शकले नाही. ती त्या वेळी दोन्ही कुटुंबाचा पाठींबा असतांना वडिलांचा दबाव, दहशतीवर मात करू शकली नाही आणि आता जातक हि अभिलाषा बाळगतो आहे कि ती माझ्या जीवनात परत येईल. तिचा घटस्फोट वगैरे होण्याची काही शक्यता आहे का? हे अनैतिक आहे. यात काहीच दोष नसलेला तिचा पती, जर संतती असेल तर ती यांची होरपळ का करायची? तिच्या वैवाहिक जीवनात काही समस्या यावी आणि तिने माझ्या कडे परत यावे किंवा विवाहबाह्य संबंध ठेवावे अशी कल्पना देखील करणे हे निर्मळ प्रेमाचे लक्षण खचित नाही. टिव्ह, ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म वरील मालिकांचा प्रभाव हा. विफल प्रेमाचे दु:ख स्वत: श्रीकृष्णांनी देखील पचवले ना? श्रीराधेच्या विवाहा नंतर ते फिरून तिच्या जीवनात गेले नाही कि न तिचे अकल्याण चिंतिले.

काही वर्षांपूर्वी ‘गारवा’ नावाचा मराठी कविता अधिक गाण्यांचा एक अल्बम खूप लोकप्रिय झाला होता. त्यातील एक गाणे या स्थितीवर चपलख बसते. सोबत त्याची लिंक देवून विराम घेतो. 


 

पुढील लेख:- लाटेवर स्वार कि लाटेवर मात?

सोमवार, १८ मार्च, २०२४

बघ माझी आठवण येते का? भाग- १

 

||श्री||

मागील लेख:- अष्टोत्तरी दशा 

बघ माझी आठवण येते का? भाग- १




हि कहानी आहे शशिकांत उर्फ शशी आणि ज्युली. (बदलेली फिल्मी नावे.) अनेक अंतर जातीय/धर्मीय प्रेम विवाह होतात तर अनेक जणांच्या वाटा काही पावसाळे पाहून वेगळ्या होतात. कथा तशी नेहमीचीच आहे पण आपण ज्योतिष अंगाने बघणार आहोत. ज्योतिष शास्त्रात काही गोष्टी निषिद्ध असल्याने मी जातकाच्या कुंडलीतील विवाह सौख्य पहायचे ठरवले.



L बु(के), S , R बु(के), D चं.  शशीच्या कुंडलीत सप्तमाचा सब शनि आहे. शनि शासक ग्रहात नाही. तसा तो शासक रविच्या युतीत आहे. सप्तमाचा सब शनि, सप्तमावर शनिची लग्नातून दृष्टी, शनिचीच महादशा ११/१०/२०१० ते २०२९ पर्यंत म्हणजे २० ते ३९ व्या वया दरम्यान आहे. शनि त्याचा न.स्वामी रवीच्या दृष्टी मुळे ५ चा कार्येश होतो आहे. पंचमाचा सब गुरु २ चा बलवान कार्येश आहे तसे तो सप्तमात आहे. पण शनि किंवा त्याचा न.स्वा रवि स्थिर राशीत नसल्याने प्रेम विवाहास पुष्टी मिळत नाही. प्रार्थमिक अहवाल सांगतो कि प्रेम विवाहास शशीच्या सबचा नकार आहे. (अर्थात अश्या कार्येशत्वावर विवाह झाल्याचे उदाहरणे आहेत पण प्रयत्न, तडजोडी कराव्या लागतात.) सप्तमेश बुध शुक्र युक्त व्दादशात पंचमेश मंगळाच्या दृष्टीत व शुक्र मंगळ राशी परिवर्तन हे प्रेम विवाहास पोषकयोग ही प्रेमविवाह घडवू शकले नाही.  याच शनिची महादशा आहे. शनि ,२,१०,११ व दृष्टी संबंधातून ५ चा कार्येश आहे. शनि विवाह अनुकूल व विरोधी दोन्हींचा मिश्र कार्येश आहे. जातकाची ज्युलीशी ओळख सोशल मिडीयावर जून/जुलै २०१९ मध्ये शुक्र अंतर्दशेत गुरु विदशेत झाली. शुक्र ,२,,१०,११ चा बलवान व दृष्टी संबंधातून ५ चा कार्येश आहे. गुरु ,२,,९,११ चा बलवान व दृष्टी संबंधातून ,५,१२ चा कार्येश आहे. हा फक्त परिचय असावा लगेच प्रेमाची कबुली दोघांपैकी कुणी दिली नसावी. प्रेमाची कबुली तिने आधी दिली ०३/११/२०१९ रोजी लग्नाचा प्रस्ताव ठेवून.


जैसे पर्बत पे घटा झुकती है,

जैसे सागर में लहर उठती है,

ऐसे किसी चेहेरे पे निगाह रुकती है,

ओsss रोक सके ना इन नजरो को दुनिया भर कि रसमे,

ओss ना कुछ तेर बसमे है ज्युली ना कुछ मेरे बस मे || 

प्रेमी आणि कवी दोघांना कारण मिमांशेची गरज नसली तरी ज्योतिषाला ती करावी लागते. प्रेमाची कबुली तिने आधी दिली लग्नाचा प्रस्ताव ठेवून. त्या वेळी शुक्र भूक्तीत शनि विदशा होती. दोघांचेही कार्येशत्व पाहिले आहेच. हा जो प्रस्ताव आला तो महादशा, विदशानाथ शनिच्या ५ च्या दुय्यम कार्येशत्वा मुळे. अंतर्दशानाथ शुक्र हि ५ चा दुय्यम कार्येश आहे. पंचमेश मंगळ व सप्तमेश बुध यांची दिप्तांश दृष्टादृष्ट असल्याने जातक सांगतो ते खरे असावे कि प्रेमविवाहाचा प्रस्ताव पहिले तिने ठेवला. ज्युलीचे वडील वगळता दोन्ही घरांची विवाहास मान्यता होती. जातक तिच्या पेक्षा उच्चवर्गीय आहे. २४/१०/२०२१ ला विवाह निश्चित करण्या करता बैठक झाली. त्यात तिचे वडील आपमान होईल असे बोलत होते. परिणामी विवाह मोडला. ज्युलीच्या घरचे म्हणत होते वडिलांचा स्वभावच तसा आहे. तुम्ही दुर्लक्ष्य करा. तुमचे प्रेम आहे ना मग भले तुम्ही पळून जाऊन विवाह करा. जातकाच्या घरच्यांनीही पाठिंबा दर्शविला. पण ज्युलीची तयारी नव्हती. ती म्हणाली पळून गेलो तर वडीलांनी शशीचे कुटुंब संपवण्याची धमकी दिली आणि ते तसे करतील. दुय्यम योगांच्या आधारांवर शशीच्या जीवनात प्रेमाचा बहार आला असल्याने हे यशस्वी झाले नाही. चंद्र अंतर्दशेत (१४/०९/२०२१ ते १५/०४/२०२३) शशीचा प्रेमभंग झाला व पारंपारिक विवाह ठरला. चंद्र ,२,,११ चा बलवान व दृष्टी संबंधातून ५ चा कार्येश आहे. सर्वच ग्रह विवाहा संबंधी मिश्र कार्येशत्व देत आहेत. अश्या वेळी फार प्रयत्नाने अनुकुलत्व आपल्या बाजूला वळवावे लागते. चंद्र विवाह विरोधी प्रमुख ६ चा बलवान कार्येश असल्याने ना प्रेम विवाह झाला ना पारंपारिक विवाह. प्रेम विवाह फिस्कटला तो चंद्र अंतर्दशा विदशेत. तर प्रेम संबंध संपुष्टात आले ते चंद्र अंतर्दशा गुरु विदशेत. गुरु ५ सोबत प्रेमविरोधी ४ चाही दुय्यम कार्येश आहे. शुक्र गुरुत प्रेम जुळले ते चंद्र गुरुत संपुष्टात आले.  महादशानाथ व विदशानाथ एकच आहेत फक्त अंतर्दशानाथ बदलले आहेत. शुक्र आणि चंद्र यांचे न.स्वामी वेगळे असले तरी पापग्रह (शनि, राहू) आहेत व १,२ हे समान मिश्र कार्येशत्व दोघेही देत आहेत. मग तरीही फलीतात असा बदल का? गोचरी तर आहेच पण शुक्र चंद्राचे सब बघा. शुक्र शनीच्या तर चंद्र शुक्राच्या सब मध्ये आहेत. शुक्र ६ या प्रमुख विवाह विरोधी भावाचा कार्येश आहे. त्यामुळे शुक्र अंतर्दशेत प्रेम जुळले व चंद्र अंतर्दशेत प्रेम विफल झाले. हे उदाहरण ग्रहांचे फळ देण्याच्या प्रवृत्ती विषयीचे मुलभूत नियम अभ्यासनास उपयुक्त आहे. प्रेम जुळले तेव्हा सप्तमाचा सब शनि लग्नी होता व विफल झाले तेव्हा व्दितीयात. ज्युलीने लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा शनि गुरुच्या सब मध्ये गोचर करत होता. गुरु ११,९ चा बलवान कार्येश आहे. प्रेम विफल झाले तेव्हा शनि राहुच्या नक्षत्रात गोचर करत होता व राहू ११ या अनुकूल बरोबरच १० या विरोधी भावाचा बलवान  कार्येश आहे. 


आ मै तेरी याद में सब को भुला दु,

दुनिया को तेरी तसबीर बना दु,

मेरा बस चले तो दिल चीर के दिखा दु,

ओsss दौड रहा है संग लहू के प्यार तेरा नस नसमें,

ओss ना कुछ तेर बसमे है ज्युली ना कुछ मेरे बस मे ||

अशी काहीशी शशीची अवस्था झाली असावी हे आपण समजू शकतो. “जा सिमरन जी ले अपनी जिंदगी|” अस म्हणणारा प्रियेशीचा बाप सगळ्यांच्याच नशिबी नसतो.

क्रमश: ........

ज्या गीताची आपण आठवण केली आहे ते किशोर कुमारच्या आवाजातले गीता ऐकू या, लिंक देत आहे. हृतिक रोशन व यामी गौतमी वर 'काबील' मध्ये चित्रांकित केलेल्या या गीताचा रिमिक्स कानाला त्रास देते. तेव्हा हे मूळ गाणच देतो.


पुढील लेख :- बघ माझी आठवण येते का? भाग-२.