बुधवार, २९ जून, २०२२

बंडात बंडाळी ?

 ||श्री||

मागील लेख:- नक्षत्र शंका.



बंडात बंडाळी ?




महाराष्ट्रात सध्या राजकीय सुंदोपसुंदी चालू आहे. मविआ चे मुख्यमंत्री श्री.ठाकरे साहेबांनी राजीनाम देणार नाही बहुमत सिद्ध करेल असे सांगितले. मुख्यमंत्री जरी बंडखोर आमदारांना चुचकारत असले तरी खुद्द त्यांचे चिरंजीव व प्रवक्ते श्री.राऊत यांच्या वाक्तव्यांमुळे नाराजी अधिक वाढल्याचे दिसून येते आहे. तसेच ते बंडखोरांमधील आमदार आमच्या संपर्कात असून मुंबईत येताच ते आमच्या कडे परत येतील हे सांगत आहेत. याच आत्मविश्वासाच्या जोरावर मुख्यमंत्री राजीनामा देत नसावेत पण दुसरीकडे ते बहुमत सिद्ध करा या आदेशा विरुद्ध कोर्टातही गेले आहेत.  त्यामुळे बंडखोरांमध्ये खरच दुफाळी आहे का? असा संशय प्रजाजनांना आहे. तो हमने स्वयं संज्ञान लेते हुये इसके लिये प्रश्न कुंडली निर्माण कि है|

२९/०६/२०२२, दु.१५:५४:१५ ला नाशिक मुक्कामी बंडखोरांमध्ये बंडखोरी होईल का? या साठी प्रश्नकुंडली मांडली. 


 

तूळ लग्न मिथुन नवमांशाची कुंडली आहे. चर लग्न आहे त्यामुळे घटना आता वेगवान घडणार आहेत, मंदावलेल्या पटकथेने वेग घ्यावा तसा. लग्नात केतू लग्नबिंदू जवळ आहे तो मुख्यमंत्र्यांची सध्याची मानसिकता दर्शवित आहे जी आपल्याला माहित आहे ती म्हणजे अलिप्तता, संपर्काचा अभाव. लग्नेश शुक्र अष्टमात व्ययेश बुध युक्त, शुक्र बुध इशर्रफ हे दर्शवितो कि नुकसान अगोदारच झालेले आहे म्हणजे याचा आपण असा अर्थ काढू शकतो कि झालेले नुकसान सध्यातरी भरून निघणार नाही म्हणजेच बंडखोर परत येण्याची आशा नाही. परस्थिती दोन्ही बाजूने पहावी लागेल. दुसऱ्या गटात जर काही धुसफूस असेल तर त्याचा फायदा मिळू शकतो. बंडखोर गटाची ग्रहस्थिती काय कल दाखवते ते पाहू. लग्ना पेक्षा सप्तमात ग्रहाधिक्य आहे. लग्न सप्तमात केतू राहू आले जे हे दर्शवितात कि एकाच पक्षाचे दोन तुकडे. शिवसेनेचे विभाजन होणार हे तर आता काळ्या दगडावरची रेष आहे हे स्पष्ट होते आहे. केतू राहू विभाजन दाखवत आहेत पक्षांतर नाही. छत्रयोग देणारा राहू बंडखोरांचा प्रतिनिधी आहे कारण सप्तमबिंदूच्या सर्वात जवळ तो आहे त्यामुळे सत्ता बंडखोरांच्या ताब्यात जाईल. याचा अर्थ असाही घेता येईल कि शिवसेनेची जी ताकद आहे, सत्ता आहे ती बंडखोरांकडे जाईल आणि एकजुटी शिवाय हे शक्य नाही त्या मुळे बंडात बंडखोरी होईल असे वाटत नाही निदान बंडावर परिणाम करेल इतकी तरी नाही. बंडाला अजून शक्ती मिळणार आहे कारण साधारण महिन्याने ३१ जुलै ला राहू हर्षल युती होत आहे. मुख्य म्हणजे सप्तमेश मंगळ सप्तमातच असून तो राहू हर्षलशी इत्थशाल करत आहे. हि बलवत्ता व पुढे जाऊन प्राप्त होणारी विध्वंशक शक्ती यांचा विचार करता बंडात बंडाळी होईल असे वाटत नाही. लग्नाचा लाभेश रवी हा नवमात म्हणजे दूर आहे तर सप्तमाचा लाभेश शनि म्हणजे बंडखोरांचा मित्रपक्ष हा स्वस्थानी आहे शिवाय वक्री आहे आणि त्याची दृष्टी सप्तमावर आहे विशेषत: सप्तमेश मंगळावर अंशात्मक दृष्टी आहे त्यामुळे तो धोरणीपणा, कुटनीतीने त्यांना स्थिर करेल.    

रवी चंद्र ३/२५ चे अंतर आहे म्हणजे तो अजून अमावश्या योगातून बाहेर आलेला नाही. चंद्र दशमेश आहे तर रवि लाभेश शिवसेनेचे मित्रपक्ष म्हणजे सत्ता अजून त्यांच्या प्रभावात आहे. दशमेश चंद्र हा जरा गोंधळात टाकतो आहे कारण तो लग्नाच्या त्रिकोणात व मित्रपक्षाच्या युतीत आहे, त्यामुळे त्याचा कल जरी विद्यामान मुख्यमंत्री कडे वाटत असला तरी चंद्र शुक्र व्दिर्दादर्शक हा अशुभ योग आहे. चंद्र फक्त केतुशी इत्थशाल करत आहे. पण दशमेशाचा हा योग केतूच्या धर्माविरुद्ध आहे त्यामुळे या इत्थशालाला महत्व द्यावे कि २ जुलैला सायं ५:१५ नंतर होणाऱ्या चंद्र राहू या इशर्रफ योगाला महत्व द्यावे? मी चंद्र राहू चा सप्तम दशमातून होणाऱ्या केंद्र योगाला महत्व देवून या दिवशी सायंकाळी सत्ता विरोधांकडे जाईल असा अंदाज बांधत आहे.

अजय देवगणाच्या ‘फुल और कांटे’ मध्ये एक वाक्य आहे. अजय लहानपणा पासून वडिलांपासून दूर असतो. पुढे अजयच्या वडिलांचा उजवा हात असलेला शंकर त्यांच्या साम्राज्यावर अधिकार प्राप्त करण्यासाठी बंड करतो त्यावेळी निर्णायक क्षणी अजय शंकर वर मात करतो तेव्हा तो म्हणतो “कुछ हुनर खून हि खून को शिखलाती है|” लग्नातील केतू व दशमेश चंद्र यांच्यातील फक्त या एका शुभयोगावर या सुंदोपसुंदीत वरील वाक्याचा अनुभव येईल का हो?

  पुढील लेख लवकरच.....

  

बुधवार, १ जून, २०२२

नक्षत्र शंका

 ||श्री||

नक्षत्र शंका

मागील लेख:- विवाह 



ज्योतिष समुहातील एका ज्योतिष अभ्यासक मित्राने प्रश्न टाकला होता.

नमस्कार !

कर्क राशीतले बुधाचे आश्लेषा नक्षत्र हे तीक्ष्ण का म्हणतात ?

वास्तविक गुरू, शुक्र, बुध, चंद्र हे ग्रह तर शुभ ग्रह आहेत. शनी महातम्यातले प्रत्येक ग्रहाच्या ओव्या तर त्या ग्रहांच्या गुणधर्माला यथार्थ लागू पडतात ....

कृपया शंका समाधान करावे, ही विनंती.  

 

समुहातील अभ्यासकांनी काही मते मांडली. मी त्यावर दोनचार ओळी खर्डू म्हटले पण लिहितांना डोक्यातील टिकटिक वाढत गेली आणि लेख तयार झाला. आता तीनचार परिच्छेद झाले म्हणून लेख म्हणायचे, नाहीतर विचारचक्र कळलेखनबद्ध झाले एवढेच.  

नक्षत्रांची नाडी आणि स्वामी हे दोन घटकच आवर्ती आहेत बाकीचे घटक तसे नाहीत. आश्लेषाची देवता सर्प म्हणून ते तीक्ष्ण तर आर्द्रा, ज्येष्ठा, मूळ हि नक्षत्रे सुद्धा तीक्ष्ण आहेत पण सर्वांची देवता एकच नाही. आर्द्रा ची देवता शंकर आहे जी उग्र देवता आहे परंतु नक्षत्र तीक्ष्ण आहे. (भरणी, मघा, पूर्वा, पूर्वाषाढ, पूर्वभाद्रपदा हि उग्र नक्षत्रे आहेत.)  बुधाचेच ज्येष्ठा नक्षत्राची देवता इंद्र आहे तर मूळ नक्षत्राची देवता निऋती आहे. निऋती हि मृत्यू, शोक यांची देवता आहे जिचे वाहन कावळा आहे. शंकर, निऋती यांचा तीक्ष्णतेशी संबंध समजू शकतो पण इंद्र जो पर्जन्याची देवता आहे आणि ज्येष्ठा हे पृथ्वी तत्वाचे नक्षत्र आहे. पर्जन्याची जी नक्षत्रे आहेत त्यापैकी कोणाचीही देवता इंद्र नाही, अगदी त्यातील जलतत्वाच्या नक्षत्रांपैकीही?  तीक्ष्णचा इथे अर्थ दारुण असा घेतला जातो म्हणजेच वाईट. हि नक्षत्रे व्यभिचार, भांडणे, घात, पशुहत्या, भयंकर कृत्ये यांच्या साठी विचारात घेतात. आश्विनी, पुष्य, हस्त आणि अभिजित हि क्षिप्र संज्ञाक नक्षत्रे आहेत. क्षिप्र म्हणजे लहान मग अवकाशात यांची व्याप्ती कमी आहे का? हे पहावे लागेल. ग्रहांना नक्षत्रांचे स्वामित्व दिले आहे ते गुण, लक्षणे यांच्या साधर्म्या नुसार नाही. असा विचार करून स्वामित्व ठरवले गेले असते तर बुध ज्याचे दुसरे नावच सौम्य आहे त्याला मृग, चित्रा, अनुराधा, रेवती या मृद संज्ञाक नक्षत्रांचे स्वामित्व द्यायला हवे होते.

ग्रहांना राशी वाटपाची एक संकल्पना आहे तशी नक्षत्र वाटपाची दिसून येत नाही. अवकहडा चक्र जे कृत्तिके पासून सुरु होते. कृत्तिका हे रविचे नक्षत्र आहे जो ग्रहांचा राजा आहे त्याला पहिला मान दिला. त्यानंतर चंद्र जो राजग्रह आहे त्याचे रोहिणी नक्षत्र. पुराणात जरी चंद्र हा पुरुष आहे तरी ज्योतिषात तो स्त्री ग्रह आहे. पुराणात तर ब्रम्हाचे पुत्र प्रजापती दक्ष यांच्या २७ कन्या म्हणजे ब्रम्हाच्या नाती या चंद्राला दिल्या आहेत ज्यांची नावे नक्षत्रांना दिली आहेत. ज्यातील रोहिणी हि त्याची सर्वात प्रिय पत्नी आहे. पुराणानुसार सर्व नक्षत्रांचे स्वामित्व चंद्रा कडे जाते. असो त्या नंतर सेनापती मंगळाला मृग नक्षत्र इथपर्यंत जमते पण त्या नंतर देवगुरु बृहस्पती यायला हवे होते किंवा युवराज बुध पण मधेच राहू आहे. युवराज बुधा अगोदर सेवक शनिला मानांकन दिले आहे. उतरंड काही जुळत नाही. दुसरे असे कि अवकहडा नावात कृत्तिका ते आश्लेषा या सात नक्षत्रांचाच विचार केला आहे. नक्षत्र आवर्तन सारणी तर नऊची आहे?

मग प्रश्न असा पडतो कि मूळ अवकहडा चक्राचे आवर्तन सातचे होते का? म्हणजे राहू केतू वगळून. अभिजित सह २८ नक्षत्राचे सात ग्रहात वाटप, प्रत्येकी ४ नक्षत्रे. नंतर कालांतराने राहू केतूलाही नक्षत्रप्रदेशाचे अधिपत्य देण्यासाठी पुनर्रचना केली गेली व अभिजित नामक नक्षत्रप्रदेश खालसा करून ९ चे विभाग केले गेले? राशी स्वामित्व व नक्षत्र स्वामित्व यांचा मेळ नाही. म्हणजे बघा रवी व गुरु वगळता बाकी ग्रहांच्या राशीत त्यांचे नक्षत्रच नाही. रविच्या सिंहेत त्याच्या उत्तरा नक्षत्राचे पहिले चरण तर गुरुच्या मीनेत त्याच्या पूर्वभाद्रपदाचे चवथे चरण आहे, एकच चरण आहे पूर्ण नक्षत्रही नाही. राशी या नंतर आल्या तर मग त्यांच्या राशी ठरवतांना स्वामित्व असलेल नक्षत्र पूर्ण येईल अशी किमान एकतरी राशी त्या ग्रहाच्या पदरात टाकणे स्वाभाविक असतांना तसे का झाले नसावे? निदान ग्रहाला मुलत्रिकोण राशी दिल्या त्यावेळी तरी त्यांच्या स्वनक्षत्राचा विचार का केला गेला नाही? अपवाद चंद्र वगळता बाकी ग्रहांच्या स्वराशी पैकीच मुलत्रीकोन राशी आहे. चंद्राची मुलत्रिकोण राशी वृषभ आहे ज्यात त्याचे रोहिणी नक्षत्र पूर्ण आहे. रविच्या सिंह राशीत त्याच्या उत्तरा नक्षत्राचे पहिले चरण आहे व सिंहच त्याची मुलत्रिकोण राशीही आहे. गुरुच्या मीन राशीत त्याच्या पुर्वाभाद्रपदा नक्षत्राचे शेवटचे म्हणजे चौथे चरण आहे तरीही त्याची मुलत्रिकोण राशी आहे धनु आहे. एकट्या चंद्राचीच मूलत्रिकोण राशी स्वराशी नाही, रोहिणी त्याची प्राणप्रिय सखी असल्याने असेल असे.   

पुराणात नक्षत्र हे परलोका (दिव्यलोक) पैकी एक लोक आहे, जसे देवलोक, गंधर्वलोक, यमलोक तसे नक्षत्रलोक (शिवपुराण – श्री कार्तिकस्वामी जन्मकथा). जपानी संस्कृतीतही  नक्षत्रलोक, ग्रहलोक संकल्पना असल्याचे मागे कधीतरी वाचले होते. सूर्य, ताऱ्यावर दिव्य सृष्टी असून इहलोकातील पुण्यकर्माच्या स्वरूपा नुसार दिव्यदेह प्राप्त होऊन सूर्यादी ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या वरील नगरात नागरिकत्व मिळते. ह्या सृष्टी समकालात अस्तित्वात असूनही मर्त्य दृष्टी व साधनांनी दिसत नाहीत. श्रेष्ठ योगी दिव्यदेह (सूक्ष्म देह) धारण करून या लोकात फेरफटका मारू शकतात. हिंदू संस्कृतीतही हि संकल्पना आहेच. आजच्या भाषेत बोलायचे झाले तर हि जी नक्षत्रे आहेत त्यातील एखाद्या ताराकुलात (सूर्य कुळात) पृथ्वी सदृश्य ग्रहावर जीवन असावे. त्या जीवन समुहाचे जे गुणधर्म, लक्षणे असतील व्यवहारगुण असतील साधारण तशी गुणधर्मे नक्षत्रांना दिली असतील तर? चिंतक, तत्ववेत्ते हेच काय बालमन सुद्धा काही कल्पना रचत असतात. मामा बनवलेल्या चंद्राला बालमन गुरुजही बनवते. या थोडा फेरफटका मारून लहानपणात "या वाऱ्याच्या बसुनी विमानी....", लिंक खाली देतच आहे.

https://youtu.be/h_qfzsumig4


पुढील लेख :- बंडात बंडाळी ?