||श्री||
फर्श से अर्श तक
Name: Ramkrishna Dalmia
Date of Birth: Friday, April 07,
1893
Time of Birth: 11:09:23
Place of Birth: Chirawa
Longitude: 75 E 39
Latitude: 28 N 13
Time Zone: 5.5
Information Source: Astrology of
Professions (Pathak)
अचानक
चांदीचे भाव वाढले. त्यांनी खिशात पैसे नसतांना लंडन मधील ४ कंपन्यांतील ओळखीचा
फायदा उचलत हजारो रुपयांची चांदी बुक करणे सुरु केले. वाढत्या चांदीच्या भावाने
त्यांना खरोखर एका आठवड्यात दीड लाखाचा फायदा कमावून दिला. आलेल्या पैसातून
त्यांनी उधारी चुकवूनही त्यांच्या जवळ बराच पैसा शिल्लक होता. लाभातील राहू
अकल्पित लाभ घडवून आणतो, उद्योगपतींना चांगले यश देतो. हे फळ इथे प्रकर्षाने
जाणवते. त्यामुळे वरती आपण जो विचार करत होतो ती मंगळ अंतर्दशाच असावी. ०९ मार्च १९०७ मध्ये मंगळ अ.द संपली.
बहुधा भाकीताचा काळ हा या दरम्यानचा असावा. २० च्या दशकात ब्रिटीश सरकारने चांदी
बाबत बदललेल्या नियमाने डालमियांना फायदाच झाला. ते यातून मिळत गेलेला फायदा इतर
व्यवसायात गुंतवत गेले. या नंतर मात्र त्यांना जिथे हात टाकतील तिथे अफाट यश मिळत
गेले. २० ते ४० च्या दशका दरम्यान देशात जोमाने व्यवसाय विस्तार करत गेले. डालमिया
इंडस्ट्री बीमा, बैंकिंग, मीडिया,
केमिकल, एविएशन,
आयरन, सीमेंट,
वस्त्र
उद्योग आणि खाद्य पदार्थ सहित वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी हातपाय पसरले. २० च्या
दशकाचा विचार केला तर शुक्र महादशा जाने.१९२० मध्ये संपते. या दशकात रवी म.द.
पूर्ण व चंद्र म.द.तील काही भाग येतो. मग वरती जो आपण शुक्र म.द. मंगळ अ.द. चा
विचार केला तो काळ शुक्र म.द. केतू अ.द. चा घ्यावा लागेल. शुक्राचा व केतूचा विचार
वरती केला आहेच. केतू पंचमात वक्री हर्शल युक्त राहुच्या नक्षत्रात आहे. सट्टेबाजार
तसाही केतूचा प्रांत नाही पण तो राहूच्या नक्षत्रात आहे त्यामुळे त्याने असे
प्रतिकूल फळ दिले असावे. केतू भुक्ती नोव्हे.१९१८ ते जाने.१९२० दरम्यान होती. तसेच
सप्टें.१९१८ ते नोव्हे.१९२० दरम्यान शनि चे तृतीयातील सिंहेतून भ्रमण होते त्या मुळे
त्याची तृतीय दृष्टी पंचमावर येते व केतू भुक्ती दरम्यानच शनि वक्री हि होता. २६,२७
व्या वया दरम्यान हि भुक्ती व गोचर होते. २० ते ४० च्या दशका दरम्यान जी त्यांची फर्श
से अर्श तक प्रगती झाली ती राहू मुळे कि रवि मुळे? कारण या दरम्यान त्यांना
रवी, चंद्र, मंगळ महादशा होत्या. लाभातील राहू अकल्पित लाभ घडवून आणतो,
उद्योगपतींना चांगले यश देतो. उद्योगधंद्यातील आवक पाहून काही जादूटोणा किंवा
एखादे पिशाच्च वश केले कि काय? अशी शंका यावी असा तुफान उत्कर्ष हा राहू देतो असे
एका पिढीतील ज्योतिष मानीत. तसे फळ या कुंडलीतही दिसून येते. केतू हा सन्यस्त तर
राहू हा छत्रधारी असे म्हणतात. पण वर आपण पाहिलेच कि लाभातील हा राहू शुभ संबंधित
तर नाही. पापमध्यात, शत्रू राशीत असलेला हा राहू गुरु युतीत आहे एवढेच. रवी
दिग्बली असून कर्तृत्व,पराक्रमेश(तृतीयेश) आहे. तृतीयेश दशमात देखील हि फळे देवू
शकतो. रवि देखील मित्र राशीत आहे. रवि, गुरु, मंगळ या कुंडलीत परममित्र आहेत. दशम,
लाभ आणि व्यय यात मालायोग आहे आणि रवि या मालायोगाला कर्तृत्व, पराक्रमाची जोड देत
आहे. त्यात रवि हा सत्ताधारी, राजकारक आहे. राज्यकर्त्यांनी बदललेल्या धोरणाचा
फायदा यांना झाला हे अश्या रवी खेरीज दुसऱ्याचे फळ कसे असू शकेल? बर हा रवी शुभ
संबंधीतही आहे. रवी लग्नेश बुधाच्या नक्षत्रात आहे व बुध रविच्या नक्षत्रात म्हणजे
नक्षत्र परिवर्तन आहे, शिवाय रवि लग्नेश बुध युक्त आहे. उद्योगपतींना शनीचे देखील
सहाय्य लागते. या कुंडलीत शनि जसा कष्टदायक आहे तसा भाग्यकारही. भाग्येश शनि व
लग्नेश बुध दृष्टीपरिवर्तन योगात आहेत. हा शनी लग्नेशाच्याच राशीत व सप्तमातील धनेश
चंद्राच्या नक्षत्री आहे. चतुर्थात शनि व रवी शनि प्रतियुती माता पित्यास कष्टदायक
असली तरी लग्नेशाशी जो आपला राशीस्वामी असून नैसर्गिक मित्र आहे त्याला सुखदाता
ठरेल असे आपण म्हणू शकतो ना? बर बुध शुक्र शनि नै.मित्र आहेतच पण या कुंडलीला ते
त्रीकोनाधीपती आहेत आणि परस्पर संबंधित होत आहेत हा पराशरी नुसार शुभ योग म्हणावा.
लग्नेश बुध निचभंग राजयोगात आहे. कारण ज्या शुक्रा कडून लग्नेशाचा नीचभंग होतो आहे
तो शुक्र मालव्य पंचमहापुरुष योगात आहे आणि दशानाथ रवि हा या बुध व शुक्र युक्त
आहे. धनेश चंद्र सप्तमात मित्र राशीत त्रिकोणातील केतूच्या नक्षत्री स्वामी गुरूशी
त्रिकोणात आहे. सप्तमातील चंद्र उद्योगपतींना लोकप्रियता देतो. उत्पादने लोकप्रिय
होतात. निदान त्यांच्या दोन कारखान्याच्या मुहूर्तमेढीचा कालावधी मिळाला. १९३२-३३
मध्ये त्यांनी बिहारच्या निर्मलकुमार जैन यांच्या भागीदारीत साखर कारखाना सुरु
केला तर १९३५ मध्ये सिमेंटचा कारखान स्थापन केला. चंद्र म.द. बुध अ.द. नोव्हें. १९३१
ते एप्रिल १९३३ दरम्यान होती तर नोव्हें. १९३३ ते जुलै १९३५ दरम्यान शुक्र
अंतर्दशा व पुढे रवि अंतर्दशा जाने.१९३६ पर्यंत होती.
पंडित ज.नेहरू यांच्या
कुंडलीतही लाभात राहू आहे. काही गुण जुळत असूनही यांचे पटले नाही. स्वातंत्र
आंदोलनालाही यांनी आर्थिक पाठबळ दिले. गांधीजींनी १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहा
पासून सुरु केलेले सविनयभंग आंदोलन जवळ जवळ पूर्णतया यांच्या आर्थिक पाठबळावर झाले
असे म्हणतात तसेच यात त्यांनी सक्रीय सहभागही नोंदवला होता. सत्ताधारींना विरोध हे
फळ रवि शनि प्रतीयुतीचे. गांधीजींचा अनुग्रह व जीन्नांशी घनिष्ठ मैत्री असूनही नेहरूंशी
पंगा घेतला पण तो स्वातंत्र्या नंतर. (१९४७ नंतर त्यांचे ग्रह फिरू लागले होते.
परिवारातही वाटणी झाली.) जाने.१९४३ ते जाने.१९६१ दरम्यान त्याना राहू महादशा होती ज्यात
त्यांची दुर्दशा झाली व कारण ठरले नेहरू. नेहरूंशी टक्कर झाली त्याचे कारण म्हणजे
हिंदू कोड बिल व गोवंश हत्या विरोध हे होत. ते विभाजन व शरणार्थींची दुर्दशा या
साठी नेहरूंची उघडपणे निंदा करत पण प्रमुख कारण हिंदू कोड बिल ठरले. डालमियांनी स्वामी
करपात्री महाराजां सोबत गोहत्या व हिंदू कोड बिलाला प्रखर विरोध केला. त्यांनी
स्वामी करपात्रीं मागे आपले आर्थिक बळही लावले. स्वामींनी १९४८ मध्ये ‘राम राज्य
परिषद’ हि राजकीय पार्टी स्थापन केली. यामुळे नेहरूंशी त्यांचे संबंध बिघडले. १९५५
व १९५६ मध्ये विरोधाला न जुमानता हिंदू कोड बिल चार भागात पास झाले. त्यानंतर १९५६
मध्ये डालमियांची चौकशी करण्यासाठी नेहरूंनी विवियन बोस आयोग नेमला. त्यांच्यावर
करचुकवेगिरी, पैस्यांची व शेअरबाजारात अफरातफर इ. आरोप लागले. त्यांना आपल्या
कंपन्या कवडीमोलाने विकाव्या लागल्या. तीन वर्षाचा कारावास भोगावा लागला. राहू
महादशेत शुक्र अंतर्दशा जुलै १९५४ ते जुलै १९५७ दरम्यान होती. पुढे रवी अंतर्दशा
जून १९५८ पर्यंत तर चंद्र अ.द. डिसें.१९५९ व मंगळ अ.द. जून १९६१ पर्यंत होती.
कारावास बहुधा रवि ते मंगळ भुक्ती दरम्यान येईल. नक्षत्र गोचरी नुसार राहू महादशा
साधन दशा होती तर राहू जन्म नक्षत्रात होता तरी त्या दशेत दुर्दशा झाली. नोव्हेंबर
१९५५ ते फेब्रु. १९६१ दरम्यान त्यांना साडेसाती होती. साधारण वयाच्या ६५ ते ६८
दरम्यान त्यांना कारावास भोगावा लागला. शनि महादश शनि अंतर्दशेत (जाने.१९७७ ते जाने.१९८०)
रवि विदशा (६/८/१९७८ ते ३०/९/१९७८) ८५ व्या वर्षी २६ सप्टें.१९७८ मध्ये त्यांचे
निधन झाले. सप्टें.१९७७ ते नोव्हें.१९७९ दरम्यान अष्टमेश शनीचे तृतीयातून भ्रमण
होते तर गोचर राहूचे चतुर्थातून शनि
वरून भ्रमण होते. 🙏
.png)



