|| श्री ||
प्लॉट खरेदी १/२
मागील भागात आपण पाहिले कि श्री. सुहास गोखले सरांनी पाश्चात्य पद्धत वापरून विश्लेषण केले होते. या भागात आपण वाचणार आहोत त्यांनी याच प्रश्नाचे कृष्णमुर्ती पद्धतीने केलेले विश्लेषण.
भाग-२
प्रश्न: जातक एक
जागा (प्लॉट) खरेदी करु ईच्छीतो आणि त्या संदर्भात त्याची जागा मालकाशी (विक्रेता)
बोलणी चालू आहेत. हा व्यवहार होईल का, जागा खरेदी करता
येईल का?
आता याच प्रश्नाची
उकल आपण नक्षत्रपद्धतीने करण्याचा प्रयत्न करु:
जातकाने ज्या क्षणी
प्रश्न विचारल्या त्या क्षणाची आणि ठिकाणाची निरयन, भावचलीत , प्लॅसीडस पद्धतीची
पत्रिका शेजारी दिली आहे.
14 Oct
2019 , 16:41:36 , Nasik 73e48'00 19n59'00
Geocentric,
Nierayan, Placidus, Meane Node, Ayanamsha: 24:02:35
नक्षत्र पद्धतीत
सर्वप्रथम ‘चंद्रा’ ची साक्ष काढण्याचा प्रघात आहे. या चंद्राच्या स्थितीतून
म्हणजेच चंद्राच्या कार्येशत्वा वरुन प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात नेमके
काय घोळत होते याचा काहीसा बोध होतो, जर चंद्राचे
कार्येशत्व जातकाच्या प्रश्नाशी काहीसे मिळते जुळते असेल तर जातकाने प्रश्न अगदी
मनापासून आणि तळमळीने विचारला आहे असे मानतात. यालाच पत्रिका ‘रॅडीकल’ आहे असे
समजतात.
अर्थात हे असे असले
तरी ही काही अगदी निर्णायक अशी तपासणी नाही. प्रश्न विचारते वेळी जातकाच्या
मनात इतरही अनेक विचार असू शकतात, प्रश्न विचारणारा
काळजीत असतो, काहीसा निराश असतो त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या मनात एकाच वेळी अनेक
विचारांचे / पर्यायांचे काहूर माजलेले असणे शक्य असते त्यामुळे कदाचित प्रश्नाच्या
वेळी त्याच्या मनात दुसरा कोणतातरी प्रबळ विचार (डॉमिनंट थॉट) असला तरी त्यामुळे
मूळ प्रश्नाचे गांभिर्य कमी आहे असे म्हणणे काहीसे अन्यायाचे ठरेल.
इथे चंद्र लग्नात
आहे (१) ,
चंद्राची कर्क रास
षष्ठम (६) स्थानावर आहे, चंद्र केतू च्या नक्षत्रात आहे आणि केतू दशमात आहे, चंद्राचे
कार्येशत्व १०/१/-/६ असे आहे.
आता जातक जागा
खरेदी करणार आहे म्हणजे चतुर्थ (४), लाभ (११) आणि व्यय
(१२) भाव विचारात घ्यायचे.
चंद्राचे
कार्येशत्व बघितले तर त्याचा मेळ ४,११, १२ शी बसत नाही.
म्हणजे जातकाने तळमळीने प्रश्न विचारला नाही असे समजायचे का? चंद्राची साक्ष अशी
प्रतिकूल असेल तर अनेक ज्योतिर्विद केस लगेचच बंद करतात, जातकाला काही
काळानंतर,
मन शांत करुन, प्रश्नावर मन
केंद्रीत करुन प्रश्न विचारा असे सुचवतात.
मी चंद्राची साक्ष
जरुर घेतो पण त्याचा फारसा ‘बाऊ’ करत नाही.
प्रश्न करते वेळी जातकाच्या मनात नेमके काय विचार चालू होते ही माहीती
आपल्याला कळली आहे ही त्या प्रश्ना बाबतच्या पार्श्वभूमी चा एक भाग आहे असे समजून
केस लगेच बंद न करता संशयाचा फायदा जातकाला देऊन पुढचे अॅनालायसीस करतो.
जागेची खरेदी हा
मुद्दा असल्याने चतुर्थ (४) भाव हा प्रमुख भाव म्हणून विचारात घ्यायचा, आता या पायरीवर या
चतुर्थ भावाचा ‘सब’ तपासायचा. इथे चतुर्था (४) चा सब आहे ‘बुध’, या बुधाचे
कार्येशत्व तपासायला लागेल.
बुध अष्टमात (८)
आहे,
बुधाची मिथुन राशी
पंचम (५) भावावर तसेच चतुथ (४) भावावर पण आहे तर बुधाची दुसरी राशी , कन्या ही या
पत्रिकेत लुप्त आहे त्यामुळे बुधाला फक्त मिथुनेचेच स्वामीत्व लाभलेले आहे. बुध
गुरुच्या नक्षत्रात आहे, गुरु नवम (९)
स्थानात असून , गुरु ची धनु राशी
दशम (१०) आणि लाभ (११) स्थानांवर आहे
गुरुची दुसरी राशी , मीन ही या पत्रिकेत
लुप्त आहे त्यामुळे गुरू ला फक्त धनेचेच स्वामीत्व लाभलेले आहे.
बुधाचे कार्येशत्व:
९ / ८ / --. १० , ११ / --,४, ५
“घटनेच्या
संदर्भातल्या प्रमुख भावाचा ‘सब’ हा घटने साठी विचारात घेतलेल्या भावां पैकी एकाचा
तरी कार्येश असावा.”
घटने संदर्भातल्या
प्रमुख भावाचा म्हणजेच चतुर्थ (४) भावाचा सब ‘बुध’ हा ९, ८,१०,११ , ४, ५ या भावांचा कार्येश आहे आणि घटने साठी विचारत
घेतलेले भाव ४, ११, १२ असे आहेत म्हणजे बुध हा चतुर्थ (४) आणि लाभ
(११) कार्येश असल्याने घटने संदर्भातल्या
दोन भावांचा कार्येश आहे. याचा अर्थ घटने संदर्भातल्या प्रमुख भावाच्या सब चा
होकार आहे.
सब चा होकार आहे
असे असले तरी घटना घडणारच असा कयास आपल्याला निश्चितच करता येणार नाही.
नक्की काय याचा
निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला आगामी काळात येणार्या दशा- अंतर्दशा आणि विदशा
त्याच बरोबर ट्रांसिट्स पण तपासायला लागतात, हे सगळे जुळून आले
तरच घटना घडेल असे म्हणता येईल. प्रश्नकुंडलीत, प्रश्न विचारते वेळी, केतू ची महादशा, रवीची अंतर्दशा चालू आहे.
महादशेचा प्रथम
विचार करु. केतू महादशा १७ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे.
केतू दशमात (१०)
आहे, केतूला राशी स्वामित्व नसते. केतू शुक्राच्या
नक्षत्रात आहे, शुक्र अष्टमात (८)
आहे , शुक्राच्या राशी त्रितिय (३) आणि अष्टम (८)
स्थानावर आहेत , केतू गुरुच्या
राशीत आहे आणि शनीच्या राश्यात्मक युतीत आहे. त्यामुळे गुरु आणि शनीचे कार्येशत्व
देखील केतू ला मिळणार आहे.
केतू: ८ / १० / ३ , ८ / --
युती शनि: ८/ १० /
३ , ८ / १, १२
राशी स्वामी
गुरु: ८ / ९ / ४ , ५ / १०, ११
महादशा स्वामी केतू
राहू च्या सब मध्ये आहे.
राहू चे
कार्येशत्व:
राहू: ४ / ४ / -- / --
दृष्टी शनि: ८/ १० / ३ , ८ / १, १२
राशी स्वामी बुध: :
९ / ८ / --. १० , ११ / --,४, ५
महादशा स्वामी केतू
चा सब राहू हा चतुर्थ (४) , लाभ (११) आणि व्यय (१२) अशा घटने संदर्भातल्या
सर्वच भावांचा कार्येश होत आहे, ही एक चांगली बाब आहे. पण स्वत: महादशा
स्वामी केतू घटने संदर्भातल्या लाभ (११) आणि व्यय (१२) स्थानांचा अगदी क्षीण असा
कार्येश आहे, हे काही फार चांगले लक्षण मानता येणार नाही.
केतू महादशा फलदायी
ठरेल? केतू कडे क्षीण कार्येशत्व तर आहे आणि सब राहू
चांगला अनुकूल आहे, शिवाय महादशेची तब्बल पाच वर्षे शिल्लक आहेत, या महादशेत घटना
घडू ही शकते, तेव्हा या संशयाचा
फायदा जातकाला देऊन पुढे सरकू,
आता अंदर्दशा
तपासायच्या .
प्रश्न करते वेळी
रवीची अंतर्दशा चालू आहे आणि ती २१ डिसेंबर २०१९ पर्यंत चालणार आहे, हा कालवधी प्रश्न
विचारल्या पासून सुमारे सव्वा दोन महीने आहे. जागेचा व्यवहार या सव्वा दोन
महिन्यात होऊ शकतो.
अंतर्दशा स्वामी
रवी चे कार्येशत्व: ७ / ७ / २ , ९ / ७
रवी गुरुच्या सब
मध्ये, गुरु:
: ८ / ९ / ४ , ५ / १०, ११
आता इथे अंतर्दशा
स्वामी रवी स्वत: प्रश्ना संदर्भातल्या एकाही भावाचा कार्येश नाही आणि रवीचा सब
गुरु जरी प्रश्ना संदर्भातल्या लाभ (११) आणि व्यय (१२) भावांचा कार्येश असला तरी
ते अत्यंत दुबळे, क्षीण कार्येशत्व आहे. इतक्या कमकुवत आधारावर ही
रवी अंतर्दशा फलदायी ठरेल? शक्यता नाही !
त्यामुळे आपण रवी
अंतर्दशा सोडून देऊन पुढच्या चंद्र अंतर्दशेचा विचार करु.
ही चंद्र अंतर्दशा
२२ जुलै २०२० पर्यंत चालणार आहे.
अंतर्दशा स्वामी
चंद्राचे कार्येशत्व आपण या आधीच तपासले आहे:
चंद्र: १०/१/-/६
चंद्र रवीच्या सब
मध्ये आहे, रवी: ७ / ७ / २ , ९ / ७
इथे अंतर्दशा
स्वामी चंद्र प्रश्ना संदर्भातल्या एकाही
भावाचा कार्येश नाही आणि त्याचा सब रवी पण प्रश्ना संदर्भातल्या एकाही भावाचा
कार्येश नाही म्हणजे कोणत्याही अंगाने ही चंद्र अंतर्दशा फलदायी ठरणार नाही !
चंद्र अंतर्दशा
सोडून देऊन पुढच्या मंगळाच्या अंतर्दशेचा विचार करावयाचा का?
चंद्र अंतर्दशा २२
जुलै २०२० पर्यंत चालणार आहे, म्हणजे हा कालावधी प्रश्न विचारल्या पासुन
नऊ महिन्यां इतका आहे. मंगळाची अंतर्दशा त्यानंतर सुरु होईल.
साधारणत: प्रश्न
कुंडलीचा आवाका तीन ते सहा महिने इतकाच असतो (ठेवावा) काही अपवादात्मक परिस्थितीत
हा कालवधी वर्ष- दीड वर्ष इतका लांबवता येतो ही उदा: संतती विषयक प्रश्न, पण जातकाचा प्रश्न
जागा खरेदी संदर्भात असल्याने त्या साठी नऊ महीन्यां पेक्षा जास्त कालावधीचा
(म्हणजे मंगळ, राहू अंतर्दशां) विचार करण्याची आवश्यकता नाही. घटना घडणारच असेल तर ती
रवी किंवा चंद्र अंतर्दशेतच घडेल अन्यथा नाही.
आपण बघितले की या
रवी आणि चंद्र दोन्ही अंतर्दशा अनुकूल नाहीत, फलदायी नाहीत.
त्यामुळे जातकाला अपेक्षीत असलेली घटना घडणार नाही.
जातकाला दिलेला
निर्णय: जागा खरेदी होणार नाही.
शुभं भवतु
पुढील लेख लवकरच.....
पुढील लेख लवकरच.....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा