|| श्री ||
साठी
उत्तरकांड भाग -१
नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर हा प्रश्न
विचाराला गेला आहे.
या स्री जातकाने वयाच्या ६१ व्या
वर्षी घटस्फोट घेतला लगेच दुसरा विवाह केला ७५
वर्षाच्या व्यक्तीशी. दोन ही प्रेम विवाहच केले. ते कसे?
स्त्री :- २६/३/१९५४, सायं ७:३०, डहाणू रोड
नक्की तारखा माहित नाहीत परंतु दुसऱ्या विवाहास एप्रिल मधे ५ वर्ष होतील त्या आधी ६ महिने घटस्फोट झाला.
स्त्री :- २६/३/१९५४, सायं ७:३०, डहाणू रोड
नक्की तारखा माहित नाहीत परंतु दुसऱ्या विवाहास एप्रिल मधे ५ वर्ष होतील त्या आधी ६ महिने घटस्फोट झाला.
म्हणजे दुसरा विवाह एप्रिल
२०१५ मध्ये झाला, तर पहिला विवाहाचा घटस्फोट नोव्हें.२०१४ मध्ये झाला. घटस्फोट
साधारणता वय ६० वर्षे ८ महिन्यांनी राहू महादशा बुध भुक्ती शनी विदशेत (६/११/२०१४
ते २/४/२०१५) झाला असे सुरवातीला मानू या. (कारण नक्की तारीख माहित नाही म्हणून)
तर दुसरा विवाह साधारणता वय ६१ वर्षे १
महिन्यांनी राहू महादशा केतू भुक्ती केतू विदशेत (२/४/२०१५ ते २४/४/२०१५) झाला असे
सुरवातीला मानू या.(पुन्हा कारण नक्की तारीख माहित नाही म्हणून)
जातकाचा जन्म १९५४ मध्ये डहाणू रोड
सारख्या ग्रामीण म्हणता येईल अश्या भागातला. हा काळ अचूक जन्म वेळे विषयी साशंकता
निर्माण करणारा आहे. त्या काळात जन्मवेळ अंदाजे/सदोष असण्याची शक्यता बऱ्या पैकी
होती. त्यात चर्चित विषयाच्या घटनांच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत. उपलब्ध
माहिती आधारे विश्लेषणाची इमारत उभी करूयात, काय चालतंय नव्ह? चालवायलाच हव (घ्या
धकून).
धकून घ्यायला हरकत नाही,
कारण ज्योतिर्विदांचा प्रश्न नेमका आहे तो म्हणजे “दोनी ही प्रेम विवाहच केले. ते
कसे?” मी प्रश्न नेमका व स्पष्ट आहे म्हणालो ते का हे पुढे स्पष्ट
होईलच, पण उपलब्ध माहितीवर धकून घेण्यासारखे आहे असे मी का म्हणालो? तर हा प्रश्न
आपल्याला सांगतो आहे की कालनिर्णय करायचा नाहीये. कोणत्याही दशा, अंतर्दशा, विदशेत
घटाना घडली असेना का त्याचाही विचार करायची आवश्यकता नाहीये (अज्जिबात नाही केला
तरी आक्षेप नाही). पहिले सहजीवन किती काळ? (झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे
चालावे. जीवन गाणे गातच रहावे. गाण्याची लिंक पाठवू का?) नका हा विचार करू. घटस्फोट
का झाला? ( याचाही विचार नाही करायाचा आहे हो.) ते बाकी जाउद्या हो फक्त आणि फक्त
सांगा “दोन्ही ही प्रेम विवाहच केले. ते कसे?”
त्याचे काय आहे ना पहिला प्रेम विवाह
झाला. ठीक आहे झाला, ८० च्या दशकात हि काही एवढा बाऊ करण्याची बाब नव्हती. होत
होते प्रेम विवाह तेव्हा. या विवाहाचा घटस्फोट झाला, प्रेम विवाहाचा घटस्फोट हा ८०
च्या दशकात ( ३२ वेळा चावूनही चोथा न होणार विषय) असला तरी जातकाचा घटस्फोट २१
व्या शतकातील २० व्या दशकात झाला. या काळात घटस्फोटाचे विशेष कुणाला काही वाटत
नाही. परत लगेच दुसरा विवाह करणेही आता फार विशेष नाही. दुसराही प्रेम विवाह? (दिल
तो है दिल, दिल
का ऐतबार क्या कीजिए, आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए?) या ८० च्या दशकातील
विचार धारेची अंमल बजावणी आताचे नवतरुण लीलया करतील तर प्रश्न पडायचा प्रश्न नाही.
तरीही आपण वाजवून घेतलेलं मडक ( खर तर न वाजवताच पण प्रेमाच हे मडक कस वाजवायच
असते ते कोणाला माहित? मुळी ते “अय्या वाजवून घ्यायचे असते? हो का?”) फुटक
निघाल्यावर दुसर मडक पसंद करायला अजूनही सहसा मॉम डॅड असतात, बहुदा पारंपारिक विवाह होतो. तिथे ६०
च्या दशाकात जन्मलेला जातक ८० ची जडण घडण असलेली वयाच्या ६० नंतर पहिल्या प्रेमाला
बाय बाय करून दुसऱ्या प्रेमाला हाय हल्लो करते (‘अग्ग बाई! सासूबाई’ ला लगेच दोष
आणि डोस नका देवू, हि मालिका आत्ता कुठे आली आणि ती बहुदा प्रेमविवाहावर नाही)
म्हणजे प्रश्न तर बनतायना बॉस.
पण हा प्रश्न आपण गॉसीप
म्हणून नाही तर ज्योतिष दृष्टी कोनातून चर्चावयाचा आहे. पारंपारिक ज्योतिष नुसार
या कुंडलीत प्रेम विवाहाचे योग आहेत? म्हणूनच म्हटले ज्योतिर्विदांचा प्रश्न नेमका
आहे “दोन्ही ही प्रेम विवाहच केले. ते कसे?” ज्योतिषात या विषया वर काही नियम, योग आहेत? माझ्या परीने विश्लेषण
करत आहेच, लवकरच पुढील भागात....
बाकी दिल तो है दिल.. गाण कुणाला पहायचे असेल तर व्हिडीओ लिंक वरती दिली आहेच.
पुढील लेख:- साठी उत्तरकांड भाग-२
बाकी दिल तो है दिल.. गाण कुणाला पहायचे असेल तर व्हिडीओ लिंक वरती दिली आहेच.
पुढील लेख:- साठी उत्तरकांड भाग-२

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा