सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

खंडग्रास सूर्यग्रहण २०२२

 || श्री ||

मागील लेख :- जन्मवेळ निश्चिती -१ Rectification of Birth


खंडग्रास सूर्यग्रहण, नाशिक – २०२२



è नाशिकला ग्रहण मीनलग्न १४/४२/५२ उदित असतांना लागले आहे. अयनांश – लाहिरी २४/०९/३५. नाशिकची सिंह राशीच्या तृतीयात ग्रहण होते तर ग्रहणलग्न अष्टमात. ग्रहण तुळेत राहुच्या स्वाती नक्षत्रात धनु नवमांशात झाले. नाशिकची दुसरी रास वृश्चिकहि येते पण सिंहस्था मुळे सिंह रास प्रचलित आहे. वृश्चीकेच्या व्ययात ग्रहण होत असल्याने जास्त त्रास दायक ठरण्याचा संभव आहे. ग्रहण कुंडलीत शकटयोग झाल्याने एकंदरीत जागतिक स्तरावर आर्थिक मंदीची जी भाकिते अर्थतज्ञां कडून वर्तवली गेली त्याची पुष्टी हा योग करत आहे. भारताची मकर रास धरली तर तृतीय दशमातून हा योग होत असल्याने सत्ता वर्तुळातील स्त्रियांच्या दृष्टीने चांगला नाही. त्यांचा फारसा प्रभाव, चमक या काळात दिसून येणार नाही. त्यांची प्रतिष्ठा, पद यांना ग्रहण लागते आहे. भारताच्या अर्थमंत्री महिला असल्याने जरा चिंतेची बाब आहे पण हे मकर राशी नुसार गृहीतक आहे. भारताची धनु/मकर/मीन या तिन राशी पैकी विविध तज्ञ विचार करत असतात. असो आपण नाशिक वरून भारत व जागतिक कडे वळत आहोत माघारी नाशिकला येवू.     

ग्रहणाचा प्रभाव ६ महिने गृहीत धरला जातो पण लगतच्या पौर्णिमेला लगेच चंद्र ग्रहण आल्याने या सूर्यग्रहणाचा प्रभाव कितपत दिसेल या बाबत साशंकता आहे. नाशिक करीता संपर्क साधने, दळणवळण संबंधित व्यवसाय/धंदे ग्रहणाने प्रभावित होण्याची शक्यता आहे. मोठ्या/भीषण अपघाताची शक्यता असेल. खास करून स्त्रियांनी वाहन चालवतांना/प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे. वृश्चिकेचा स्वामी स्वस्थानापासून अष्टमात असल्याने अपघातात मनुष्यहानीचा संकेत हे ग्रहण देते. वृश्चिक चतुर्थात येत असल्याने रिअलइस्टेट क्षेत्रात मात्र उलाढाली वाढतील, या क्षेत्रात तेजी संभवते. नाशिकला जलसाठ्याची वर्षाची बेगमी झाली असली तरी जलसाठ्यांची काळजी/सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. अपघाताने अथवा निष्काळजीपणा मुळे जलसाठ्याची हानी संभवते. जलाशी संबंधित स्थापत्य दुर्घटना होऊ शकते. रवि लग्नेश व चंद्र व्ययेश असल्याने उद्योगधंदे/कारखाने यांचे चक्र मंदावण्याची शक्यता असेल. सराकारी तिजोरीत भर पडेल त्यात जास्त वाटा रिअलइस्टेट क्षेत्राचा असू शकतो. वैवाहिक संस्थेत मात्र निराशजनक स्थिती संभवते. वैधव्य/विधुरत्व, घटस्फोट यांचे प्रमाण वाढू शकते. वैवाहीकते बाबतीत, सामाजिक संबंधा बाबतीत एखादी गूढ, चमत्कारी घटना संभवते. महानगर पालिकेची निवडणूक प्रालंबीत आहे या काळत जर ती झाली तर विद्यामान सत्तारूढ पक्ष फारसा प्रभाव पाडू शकणार नाही तुलनेत विरोधी पक्ष चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तारत नाशिकला आशा आहे पण स्त्री उमेदवाराचा या काळात अशाभंग होऊ शकतो. आता होणारे चंद्रग्रहण यात काय काय ढवळा ढवळ करतो, उलथापालथ करतो ते बघावे लागेल.

पुढील लेख:- लाभ हानी.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा