गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

काळवेळेचे गणित चुकते कसे?-१/४.

 || श्री ||

काळवेळेचे गणित चुकते कसे ?

भाग -४ 

आधीच्या तीन भागात आपण काही वेगवेगळ्या पध्दतीने एका कुंडलीच्या आयुर्दाया विषयी काय निष्कर्ष येतात ते पहिले. ते भाग वाचण्यासाठी खाली त्यावर क्लिक केल्यास पोस्ट वाचता येईल.




आता दशा तपासून पाहू. सामान्यत: मध्यायू योगात पाचवी महादशा मृत्युकारक असते असा समज आहे. पण केवळ पाचवी दशा म्हणून ती लगेच मारक ठरल्याचा अनुभव नाही. पाचवी दशा लग्नेश शनीची असल्याने तिचा विचार बाजूला ठेवू. लग्न दुर्बल असता, लग्नेश ६,८,१२ त राहू केतू युक्त असता, अष्टमेश बलवान असता लग्नेशाच्या दशेचा विचार करता येवू शकतो. अल्पमध्यायू (एप्रिल२०१५ ते एप्रिल २०२९) दरम्यान जातकाला गुरु महादशा शनी भुक्ती शुक्र विदशा ते शनी महादशा शनी भुक्ती केतू विदशा होती. शनी दशेचा विचार करून झाला आहे. आयुर्दायात दशा आली एवढया कारणा वरून ती मृत्यूदायक होत नाही. ती मारक, बाधक, त्रिषडायपतींशी संबंधित असेल तर फलदायक होते. ज्या दशेचा आपण विचार करतो आहोत तो गुरु नैसर्गिकरीत्या शुभत्वात श्रेष्ठ असून नैसर्गिक जीव कारक आहे. असे असतांनाही तो मृत्युदाता झाला, का? पराशरी नुसार व्दितीय स्थान हे सप्तमा पेक्षा प्रबळ मारक असते. हा मारकेश गुरु स्वत: त्रिषडायपतींपैकी असून त्रिषडायपती चंद्राशी अन्योन्यदृष्टी संबंध करतो आहे. या मुळे गुरु मृत्यूदाता ठरला.

         आता अंतर्दशा बघू. इथे शनी मृत्यूदायक का नाही ते आपण वरती पाहिले आहेच. घटने विषयी आपल्याला माहित आहे. अन्यथा इतरही अंतर्दशा आहेत ज्या मारक ठरू शकल्या असत्या, कदाचित त्यांची निवड आपण केली असती. अंतर्दशा निवडी विषयी उडुदाय प्रदीप मधील अंतर्दाशाध्यायातील एक श्लोक मार्गदर्शक आहे. 

  

अर्थ:- ज्या ग्रहांबरोबर दशानाथ संबंध करीत असेल किंवा जे ग्रह दशानाथासारखे समानधर्मी फळ देणारे असतील त्यांच्या अंतर्दशेमध्येच दशानाथ आपले फळ देतो. गुरु बरोबर चंद्र संबंध करतो आहे. रवी, मंगळ हे गुरु समानधर्मी म्हणता येतील कारण त्यांना मारकत्व आहे. असे असतांनाही गुरूने बुध अंतर्दशा निवडली. बुध गुरु हि समानधर्मी आहेतच. गोचरीचाही विचार व्हायचा अजून म्हणा. बुध अष्टमेश, खरेश आहे. बुध मारकेश रवी व मंगळा बरोबर सहावस्थान संबंध करतो आहे. या मुळे गुरूने बुधाची निवड केली असावी. या कुंडलीत सर्वात बलवान पापग्रह रवी आहे. समजा जर आगोदर विचार केलाच असता तर रवी अंतर्दशा निवडण्याची शक्यता अधिक होती.


गोचरीचा विचार करतांना आपल्याला काही उपग्रहांचा विचार करावा लागेल ते म्हणजे शनी पुत्र मांदी व गुलिक. मांदी- धनु ८/४२/५१, गुलिक- मकर ९/५०/३१ मृत्यू समयीचे गोचर कुंडली दिली आहे. शनी धनु राशीत होता. तो चंद्राच्या अष्टमातून भ्रमण करत असल्याने पनौती चालू होती. गोचर शनी व्ययेशाच्या नवमांशराशीतून तर अष्टमेश स्थीत राशीच्या त्रिकोणातून तसेच त्रीकस्थानेशांच्या बेरजेतून निर्माण होणाऱ्या बिंदू स्थित राशीतून भ्रमण करत होता. गुरुचे मला ज्ञात गोचर नियमा नुसार भ्रमण नाही. त्याचे लग्नेशस्थीत राशीतून व चंद्राच्या षष्ठातून भ्रमण होते. दुसरे अष्टमेशाच्या नवमांशरास व मांदीच्या नवमांश राशीच्या त्रिकोणातून गुरुचे भ्रमण होते. राहू केतू व्दितीय, व्दादशात असताही असा अनुभव येतो या नुसार केतू व्ययात आहे. रवी अष्टमातून गुलीकच्या त्रिकोणातून गोचर होता. गंडांतर काळात त्रीकस्थानातून पापग्रहाधीक्य भ्रमण धोक्याची घंटा समजावी.



येथे प्रश्न उपस्थित होऊ शकतो तो म्हणजे गोचर शनीची लग्नावर दृष्टी असतांनाही असे घडावे? (म्हणजे इथेही फसगत झाली असती. लग्नाच्या व्ययात शनी आल्यावर जन्मस्थ गुलिका वरून गोचर घेतले असते. या दरम्यान गुरुचे मांदी वरून भ्रमण असेल. म्हणजे गोचर जुळण्या सारखे होते.) एक योगायोग म्हणा हवे तर, शनीचे जन्मस्थ मांदी वरून भ्रमण होते, अगदी अंश कलात्मक. तपासल्यास दिसेल कि मृत्यू पूर्वी आदल्या दिवशी साधारण याच वेळे दरम्यान शनीचे  बरोबर मांदी वरून अधिक्रमण होते. मग एक दिवसाचा फरक? एक तर गोचर चंद्र मोक्ष त्रिकोणात यायचा होता व दुसरे म्हणजे सूक्ष्म गणितातील चूक असू शकते.
अष्टकवर्गा नुसार लग्नापासून शनी स्थित भावातील शुभ बिंदूंच्या बेरेजेला ७ ने गुणून २७ ने भागावे. बाकी इतक्या अश्विनी पासूनच्या नक्षत्रातून किंवा त्याच्या त्रिकोणातून रवी वा इतर पापग्रहांचे भ्रमण असलेल्या काळात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते व आलेल्या भागाकार इतक्या वयात रोग,व्याधी होतात. या कुंडलीत बाकी ३ येते म्हणजे कृत्तिका नक्षत्र येईल. मृत्यू समयी त्याच्या नवमातून शनीचे भ्रमण होते पण भागाकार ६६ येतो उपलब्ध माहिती नुसार जातकाला व्याधी साधारण ३० च्या आसपास जडली. सर्वाष्टकात शनीला धनुत ३ बिंदू आहेत त्यामुळे शनीचे धनुतून भ्रमण कष्टप्रद असणार पण शनीला सर्वात कमी बिंदू मिथुनेत आहेत म्हणजे अजून साधारण १४ वर्षानंतर साडेसातीतील कालाचा विचार झाला असता. मृत्यू समयी रवी कन्येत तर मंगळ मकरेत होता दोघांना प्रत्येकी २ व ३ असे बिंदू म्हणजे कमीच होते हे खरे पण रविचे जरी सर्वाधिक कमी बिंदू असले तरी मंगळाचे सर्वाधिक कमी बिंदू १ मीनेत आहेत. शनी मिथुनेत, मंगळ मीनेत व रवि सिंह/कन्येत असे भ्रमण जुळत नाही. मृत्यू समयी तिघांचे कमी बिंदूतील राशीतून भ्रमण होतो एवढे एक झाले. 

आपण कुंडलीचा आयुष्य विचार काही पध्दतींनी केला. ग्रुप मध्ये कृष्णमुर्ती पध्दतीने विचार इतर सदस्यांकडून झालेला आहे पण तरीही इथे मी ब्लॉग वर लिहिण्याचा प्रयत्न करेल पुढील स्वतंत्र भागात, पण नक्की नाही. बघुया. धन्यवाद. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा